शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

बंडखोरांची नाराजी काढताना पक्षश्रेष्ठींची होतेय दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 14:11 IST

बंडखोरांची नाराजी काढताना अधिकृत उमेदवारांसह पक्षश्रेष्ठींची चांगलीच दमछाक होत आहे.

- संतोष वानखडे  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विधानसभा निवडणुकीत तिनही मतदारसंघात स्वपक्षातील तसेच मित्रपक्षातील दिग्गजांनी बंडखोरीचा पावित्रा घेतल्याने पेच निर्माण झाला आहे. बंडखोरीमुळे ऐनवेळी कोणताही दगाफटका बसू नये म्हणून बंडखोरांची मनधरणी केली जात आहे. बंडखोरांची नाराजी काढताना अधिकृत उमेदवारांसह पक्षश्रेष्ठींची चांगलीच दमछाक होत आहे.विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. तिनही मतदारसंघात स्वपक्षातील व मित्रपक्षातील दिग्गजांनी अधिकृत उमेदवारविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केल्याने प्रमुख पक्षांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षांतर्गत गटबाजी आणि मित्रपक्षातील काही गटांची नाराजी ही डोकेदुखी वाढविणारी बाब ठरत असल्याने या नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी अधिकृत उमेदवारांसह पक्षश्रेष्ठीकडून प्रयत्न केले जात आहेत. रिसोड मतदारसंघात काँग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख व भाजपाचे माजी आमदार अ‍ॅड. विजयराव जाधव यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने काँग्रेस तसेच भाजपा, सेना महायुतीत उभी फुट पडल्याचे चित्र आहे. दिग्गज उमेदवारांची बंडखोरी पक्षाला महागात पडू शकते ही बाब हेरून पक्ष श्रेष्ठींकडून मनधरणी केली जात असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत असंतुष्टांची नाराजी कायम राहते की मनोमिलन होते, यावर लढतीचे पुढील चित्र अवलंबून राहणार आहे. वाशिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नीलेश पेंढारकर, काँग्रेसचे माजी आमदार सुरेश इंगळे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करून महायुती तसेच स्वपक्षाच्या उमेदवाराविरूद्ध बंडाचे निशान फडकाविले आहे. या दोघांनाही शांत करण्याचे प्रयत्न सुरू असून, यामध्ये यश येण्याची शक्यता कमीच असल्याची चर्चा राजकीय गोटातून ऐकायला मिळत आहे. कारंजा विधानसभा मतदारसंघात ऐनवेळी माजी आमदार प्रकाश डहाके यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्याने जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे समर्थकांमधून प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे. ठाकरे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न पक्षश्रेष्ठींकडून सुरू आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत नाराजी दूर होईल, असा दावा केला जात असला तरी समर्थक आक्रमक असल्याने नाट्यमय घडामोडीची शक्यता वर्तविली जात आहे. एकंदरीत तिनही मतदारसंघातील बंडखोरांची भूमिका निवडणुकीतील लढतीचे पुढील चित्र ठरविण्यात महत्त्वाची मानली जात आहे. युती, आघाडी व पक्षातील अंतर्गत गटबाजीचा फटका बसू नये म्हणून नाराज नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांना कुरवाळण्याचा प्रयत्न होत आहे. पक्षांतर्गतचे असंतुष्ट आणि मित्रपक्षातील नाराज मंडळीची नाराजी दूर करताना तुर्तास तरी अधिकृत उमेदवार व पक्षनेतृत्वाची चांगलीच दमछाक होत असल्याची चर्चा राजकीय गोटात रंगत आहे.

टॅग्स :washimवाशिमMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019