शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

बंडखोरांची नाराजी काढताना पक्षश्रेष्ठींची होतेय दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 14:11 IST

बंडखोरांची नाराजी काढताना अधिकृत उमेदवारांसह पक्षश्रेष्ठींची चांगलीच दमछाक होत आहे.

- संतोष वानखडे  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विधानसभा निवडणुकीत तिनही मतदारसंघात स्वपक्षातील तसेच मित्रपक्षातील दिग्गजांनी बंडखोरीचा पावित्रा घेतल्याने पेच निर्माण झाला आहे. बंडखोरीमुळे ऐनवेळी कोणताही दगाफटका बसू नये म्हणून बंडखोरांची मनधरणी केली जात आहे. बंडखोरांची नाराजी काढताना अधिकृत उमेदवारांसह पक्षश्रेष्ठींची चांगलीच दमछाक होत आहे.विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. तिनही मतदारसंघात स्वपक्षातील व मित्रपक्षातील दिग्गजांनी अधिकृत उमेदवारविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केल्याने प्रमुख पक्षांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षांतर्गत गटबाजी आणि मित्रपक्षातील काही गटांची नाराजी ही डोकेदुखी वाढविणारी बाब ठरत असल्याने या नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी अधिकृत उमेदवारांसह पक्षश्रेष्ठीकडून प्रयत्न केले जात आहेत. रिसोड मतदारसंघात काँग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख व भाजपाचे माजी आमदार अ‍ॅड. विजयराव जाधव यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने काँग्रेस तसेच भाजपा, सेना महायुतीत उभी फुट पडल्याचे चित्र आहे. दिग्गज उमेदवारांची बंडखोरी पक्षाला महागात पडू शकते ही बाब हेरून पक्ष श्रेष्ठींकडून मनधरणी केली जात असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत असंतुष्टांची नाराजी कायम राहते की मनोमिलन होते, यावर लढतीचे पुढील चित्र अवलंबून राहणार आहे. वाशिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नीलेश पेंढारकर, काँग्रेसचे माजी आमदार सुरेश इंगळे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करून महायुती तसेच स्वपक्षाच्या उमेदवाराविरूद्ध बंडाचे निशान फडकाविले आहे. या दोघांनाही शांत करण्याचे प्रयत्न सुरू असून, यामध्ये यश येण्याची शक्यता कमीच असल्याची चर्चा राजकीय गोटातून ऐकायला मिळत आहे. कारंजा विधानसभा मतदारसंघात ऐनवेळी माजी आमदार प्रकाश डहाके यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्याने जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे समर्थकांमधून प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे. ठाकरे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न पक्षश्रेष्ठींकडून सुरू आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत नाराजी दूर होईल, असा दावा केला जात असला तरी समर्थक आक्रमक असल्याने नाट्यमय घडामोडीची शक्यता वर्तविली जात आहे. एकंदरीत तिनही मतदारसंघातील बंडखोरांची भूमिका निवडणुकीतील लढतीचे पुढील चित्र ठरविण्यात महत्त्वाची मानली जात आहे. युती, आघाडी व पक्षातील अंतर्गत गटबाजीचा फटका बसू नये म्हणून नाराज नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांना कुरवाळण्याचा प्रयत्न होत आहे. पक्षांतर्गतचे असंतुष्ट आणि मित्रपक्षातील नाराज मंडळीची नाराजी दूर करताना तुर्तास तरी अधिकृत उमेदवार व पक्षनेतृत्वाची चांगलीच दमछाक होत असल्याची चर्चा राजकीय गोटात रंगत आहे.

टॅग्स :washimवाशिमMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019