शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

वाशिम जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त क्षेत्राचे पंचनामे संथगतीने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 1:50 PM

वाशीम : राज्य सरकारने बोंडअळीग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले़ या आदेशावरुन कृषी विभागाने जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त क्षेत्राच्या पंचनाम्यास सुरुवातही केली, पण महिना उलटत आला असतानाही अद्यापपर्यंत पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही़ 

ठळक मुद्देमहिना उलटत आला असतानाही अद्यापपर्यंत पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाच्या ढिम्म कारभाराप्रति नाराजी आहे़

 

वाशीम : बोंडअळीच्या प्रकोपात  जिल्ह्यातील शेतकºयांचे स्वप्न  कुरतडल्या गेले़ त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने बोंडअळीग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले़ या आदेशावरुन कृषी विभागाने जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त क्षेत्राच्या पंचनाम्यास सुरुवातही केली, पण महिना उलटत आला असतानाही अद्यापपर्यंत पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही़ 

परिणामी तत्काळ आर्थिक मदतीची अपेक्षा बाळगणाºया शेतकºयांनी कृषी विभागाच्या सुस्त कारभारावर टिकेची झोड उठवली आहे़ जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपीर,रिसोड या भागात प्रामुख्याने बोंडअळीने कहर माजविल्याने कपाशी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले़  सोबतच बोंडअळीग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण करुन शेतकºयांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी याकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले होते़ दरम्यान, या वृत्ताची दखल घेत आमदार राजेंद्र पाटणी यांनी दुसºयाच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांना प्रत्यक्ष भेटून बोंडअळीग्रस्त भागाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली होती़ त्याला मुख्यमंत्र्यांनी तत्काळ हिरवी झेंडी दाखवली़ तदोत्तर जिल्हा कृषी विभागाकडून जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त क्षेत्राच्या पंचनाम्याला प्रारंभ झाला़ पंचनाम्यासाठी तालुकानिहाय कृषी  साहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक अशा तीन कर्मचाºयांची चमु तयार करण्यात आली असून ती बोंडअळीग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करीत आहे़ परंतु, कुठे समन्वयाचा अभाव, वैयक्तिक हेवेदावे, वैयक्तिक कारणांमुळे सुट्टया, सार्वजनिक सुट्टयांपायी महिना उलटत आला असतानाही अद्यापपर्यंत पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही़ त्यामुळे शेतकºयांमध्ये प्रशासनाच्या ढिम्म कारभाराप्रति नाराजी आहे़ याकडे संबधितांनी लक्ष  देवून त्वरित पंचनामे पूर्ण करावे व शेतकºयांना मदत मिळवून देण्याची मागणी शेतकºयांतून केली जात आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती