शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

नववर्षात वाशिम जिल्हा विकासाला मिळावी नवी दिशा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 12:03 IST

Washim News नववर्षात जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळावी, अशी अपेक्षा जिल्हावासियांमधून व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्दे१ जुलै १९९८ रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली.रिसोडचा अपवाद वगळता उर्वरित पाच तालुक्यांच्या ठिकाणी एमआयडीसी क्षेत्र आहे. या एमआयडीसींमध्ये अद्याप एखादा मोठा उद्योग उभा राहू शकलेला नाही.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्हा निर्मितीच्या २२ वर्षांनंतरही वाशिममध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध झाल्या नसून, नववर्षात जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळावी, अशी अपेक्षा जिल्हावासियांमधून व्यक्त केली जात आहे. वाशिम-बडनेरा रेल्वे मार्ग, वैद्यकीय महाविद्यालय, बॅरेज परिसरात विद्युत जाळे, अमरावती विद्यापीठ उपकेंद्र, एमआयडीसी क्षेत्रात उद्योगधंदे, कृषीमालावर आधारित प्रक्रिया उद्योगांची उभारणी व्हावी, अशी मागणी जिल्हावासियांमधून होत आहे.दिनांक १ जुलै १९९८ रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली. मात्र, गेल्या २२ वर्षात जिल्ह्यातील सहकार, शिक्षण, कृषी, दळणवळण, औद्योगिक ही क्षेत्र विकासाचे बाळसे धरू शकलेली नाहीत. रिसोडचा अपवाद वगळता उर्वरित पाच तालुक्यांच्या ठिकाणी एमआयडीसी क्षेत्र आहे. परंतु, दळणवळणाची आणि अन्य सुविधा उपलब्ध नसल्याने या एमआयडीसींमध्ये अद्याप एखादा मोठा उद्योग उभा राहू शकलेला नाही. शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र, एनसीसी बटालियनचे कार्यालय, केंद्रीय विद्यालय इमारतीचा प्रश्न हे सरत्या वर्षातही निकाली निघू शकलेले नाहीत. केंद्रीय विद्यालय इमारत बांधकामाचे भूमिपूजन व जिल्हा स्त्री रुग्णालय इमारतीचे लोकार्पण न झाल्याने हे दोन्ही प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. वाशिम-बडनेरा रेल्वे मार्गाचा प्रश्न सर्वेक्षणाभोवतीच रेंगाळला आहे. 

कृषीमालावर आधारित प्रकल्प हवेजिल्ह्यात खरीप हंगामात साधारणत: चार लाख हेक्टर, रब्बी हंगामात ९० हजार हेक्टरवर पेरणी होते. त्यामुळे कृषीमालावर आधारित प्रक्रिया उद्योग उभा राहिल्यास कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळून शेतकऱ्यांचाही विकास साधला जाईल. सोयाबीन, हरभरा या शेतमालावर आधारित उद्योगाच्या निर्मितीसाठी जिल्हा प्रशासनाने कृषी आयुक्तालयाकडे प्रस्तावही पाठवला आहे. नववर्षात या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न साकारेल, यात शंका नाही. पैनगंगा नदीवर ११ बॅरेजेस् उभारण्यात आले. या परिसरात विद्युत जाळे निर्मितीसाठी शासनाकडून भरीव निधी मिळाला तर सिंचनाची सोय उपलब्ध होऊ शकेल.

टॅग्स :washimवाशिमMIDCएमआयडीसी