शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत!

By admin | Updated: May 15, 2017 01:16 IST

वाशिम : डिसेंबर २०१४ मध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यासंदर्भातील नुकसान अहवाल देखील शासनाकडे पाठविण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : डिसेंबर २०१४ मध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यासंदर्भातील नुकसान अहवाल देखील शासनाकडे पाठविण्यात आला. मात्र, अद्याप संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. जिल्हयात ३१ डिसेंबर २०१४ रोजी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे गहू, हरभरा, तूर यासह इतर पिकांचे नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे १० हजार ४९० शेतकरी बाधीत झाले होते. त्यात मालेगाव तालुक्यातील ८ हजार ३२४ शेतकऱ्यांच्या ३२२.५९ हेक्टरवरील गहू, २१६१.७२ हेक्टरवरील तूर, १३७.६७ हेक्टरवरील फळपिकांसह ६१.१८ हेक्टरवरील इतर पिकांचे नुकसान झाले. यासह मंगरूळपीर तालुक्यातील १८ शेतकऱ्यांच्या २०.६० हेक्टर क्षेत्रावरील फळपिके, कारंजा तालुक्यातील २ हजार १४८ शेतकऱ्यांच्या २२०.८० हेक्टरवरील गहू, ७४५.३६ हेक्टरवरील तूर, ३६ हेक्टरवरील फळपिके आणि ३८.६० हेक्टरवरील इतर पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. दरम्यान, कृषी आणि महसूल विभागाने विनाविलंब नुकसानीचे सर्वेक्षण करून ४ हजार २३८ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून तसा अहवाल शासनाकडे पाठविला. मात्र, २ वर्षांचा मोठा काळ उलटूनही नुकसानग्रस्त एकाही शेतकऱ्याला अद्याप कुठलीच आर्थिक मदत मिळालेली नाही.