शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
5
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
6
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
7
Success Story : शेतकऱ्याच्या मुलानं बनवलं Nirmaला मोठा ब्रँड; सायकलवरुन ₹३ किलोनं विकली पावडर; वाचा करसनभाईंची कहाणी
8
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
9
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
10
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
11
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
12
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
13
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
14
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
15
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
16
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
17
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
18
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
19
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
20
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल

राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीची समस्या निकाली निघणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 1:12 PM

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: राज्यातील विविध राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्ती प्रक्रियेत येणाºया अडचणींच्या पृष्ठभूमीवर वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी स्पष्टीकरण देताना राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती राज्य शासनाकडून करून ते सर्व केंद्र सरकारच्या अखत्यारीत घेण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी शनिवारी ...

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीच्या समस्येला आज खासदार भावना गवळी यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित करून वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय भुपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या उत्तरात सांगितले की, सदरची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: राज्यातील विविध राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्ती प्रक्रियेत येणाºया अडचणींच्या पृष्ठभूमीवर वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी स्पष्टीकरण देताना राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती राज्य शासनाकडून करून ते सर्व केंद्र सरकारच्या अखत्यारीत घेण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी शनिवारी दिली.राज्यात मोठया प्रमाणात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. या कामाची प्रक्रिया अनेक महिने सुरु राहत असल्यामुळे खराब झालेल्या रस्त्यावर नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. दरम्यान तयार होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीच्या समस्येला आज खासदार भावना गवळी यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित करून वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. देशात वाहनांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. त्या अनुषंगाने केंद्र सरकार ने सुद्धा अनेक ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु केले आहे. सध्या महाराष्टÑात ६ हजार ४११ किलोमीटर राष्ट्रीय महामार्गासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी या महामर्गाच्या कामाची प्रक्रिया सुरु झाली आहे. वास्तविक राष्ट्रीय महामार्गाचे विकास आराखडे तयार करताना तसेच निविदा काढण्यात एक ते दिड वर्षाचा कालावधी जातो. या दरम्यान त्या रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही वाढलेली वाहनांची संख्या बघता नगारिकांना अशा रस्त्यामुळे कमालीचा त्रास सहन करावा लागतो त्या अनुषंगाने या  रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी निश्चित व्हावी म्हणून खासदार भावना गवळी यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर केंद्रीय भुपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या उत्तरात सांगितले की, सदरची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. देशात आता १ लाख ८० हजार किलोमीटर अंतराचे तयार करण्यात येत आहेत. देशात २२ टक्के अ‍ॅटोमोबाईलची वाढ होत असल्यामुळे हे रस्ते तयार करणे गरजेचे आहे. यातील ९१ हजार ते १ लाख ३० हजार पर्यंतचे  रस्ते राष्टÑीय महामर्गाघोषीत करण्यात आले आहे. या समोरचे प्रक्रीयेत असलेले रस्ते मुख्य राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषीत करण्यात आले आहे. अशा मुख्य राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती ही राज्य सरकारने करावयाची आहे. या रस्त्याचे काम झाल्यानंतर त्याला राष्ट्रीय महामार्ग घोषीत करून त्याची दुरुस्ती केंद्र सरकार स्वत:कडे घेईल. त्यामुळे अशा महामार्गांच्या दुरुस्तीच्या प्रश्न संपुष्ठात आला आहे.

टॅग्स :washimवाशिमBhavna Gavliभावना गवळीNitin Gadkariनितीन गडकरी