शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

सावधान...मोबाइलच्या अतिवापरामुळे मुलांना जडतोय मानसिक आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 11:56 AM

Beware of Mobile over use वेळीच सावध होऊन मोबाईलपासून मुलांना दूर ठेवावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्क vवाशिम : गत सात महिन्यांपासून ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाइलचा वापर वाढल्याने मुलांमध्ये डोकेदुखीबरोबरच मानसिक आजारही बळावत असल्याचे समोर येत आहे. पालकांनी वेळीच सावध होऊन मोबाईलपासून मुलांना दूर ठेवावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.कोरोनामुळे सर्वच क्षेत्र प्रभावित झाले असून, यामधून शिक्षण क्षेत्रही सुटू शकले नाही. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप, संगणकावरील स्क्रीन टाईम वाढला आहे. गत सात महिन्यांपासून मुलांची मोबाईलशी घट्ट मैत्री झाल्याने याचे दुष्परिणामही समोर येत आहेत. मोबाईल, संगणकावर सतत ऑनलाईन राहिल्यामुळे डोळे, मेंदुवर ताण पडतो. त्यामुळे साहजिकच डोकेदुखीचा त्रास जाणवत असून चिडचिडही वाढत आहे. मेंदूवर जास्त ताण आल्यास अभ्यासात मन लागत नाही, अतिवापरामुळे मुलांना मोबाईलचे व्यसन जडत असल्याने मानसिक आजार बळावत असल्याचे मेंदु व मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे पालकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. 

हे आहेत दुष्परिणाममुलांमध्ये मोबाईल बघण्याचे प्रमाण वाढल्याने स्थूलपणा, पचनसंस्थेचे आजार, चिडचिडेपणा, नैराश्य, अस्वस्थपणा, निरूत्साह वाढीस लागला. एकलकोंडेपणा, इतरांना मारणे, वस्तू फेकणे किंवा तोडणे, अतिचंचलता, जिद्दी व हट्टीपणा वाढला आहे. आदी लक्षणे असणाऱ्या मुलांना बालरोग, मानसोपचार तज्ज्ञांकडे नेण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते.

मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये एकाग्रता राहत नसून, एकलकोंडेपणा वाढीस लागत आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप, संगणकावरील स्क्रीन टाईम वाढल्याने नैराश्य, मानसिक आजार जडत आहेत.- डॉ. नरेश इंगळेमानसोपचार तज्ज्ञ,  वाशिम

मोबाईलपासून मुलांना शक्यतोवर दूरच ठेवणे गरजेचे आहे. अलिकडच्या काळात मुले मोबाईलच्या आहारी जात असल्याने नैराश्य, चिडचिड वाढत आहे. पालकांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे.- डॉ. राम बाजड,  बालरोग तज्ज्ञ, वाशिम

टॅग्स :washimवाशिमMobileमोबाइलonlineऑनलाइन