शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगाम संपताच मजुरांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:33 IST

वाशिम जिल्ह्यात उद्योग व्यवसायांची वाणवा आहे. प्रामुख्याने शेतीआधारित कामांवर जिल्ह्यातील ७० टक्के कामगारांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. त्यातही जिल्ह्यात कोरडवाहू ...

वाशिम जिल्ह्यात उद्योग व्यवसायांची वाणवा आहे. प्रामुख्याने शेतीआधारित कामांवर जिल्ह्यातील ७० टक्के कामगारांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. त्यातही जिल्ह्यात कोरडवाहू शेतीचे क्षेत्रच अधिक असल्याने खरीप हंगामानंतर रोजगाराची समस्या गंभीर होते. परिणामी, कामगारांना रोजगारासाठी परराज्यात, महानगरात स्थलांतर करावे लागते. कामगार कुटुंबांसह स्थलांतर करीत असल्याने त्यांच्या मुलांच्या शिक्षणावरही सातत्याने परिणाम होतो. आता खरीप हंगामातील कामे आटोपली असून, रब्बी हंगामात शेतात हरभरा काढणीशिवाय दुसरे कोणतेही काम उरले नाही. त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे यंदाही कामगारांनी रोजगाराच्या शोधात स्थलांतर सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हजारो कामगारांनी घराला कुलूप ठोकून मुलाबाळांसह परराज्यात, महानगराकडे प्रस्थान केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

-----------

वस्त्या पडू लागल्या ओस

जिल्ह्यात रोजगाराचा अभाव असल्याने हजारो मजुरांनी रोजगारासाठी परराज्यात किंवा महानगरात धाव घेतली आहे. त्यामुळे विविध गावांतील वस्त्याच ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रोजगाराच्या शोधात गेलेल्या कामगारांनी घराला टाळेच लावले आहे. त्यामुळे या वस्त्यांत शुकशुकाट दिसत आहे. या ओस पडलेल्या वस्त्यात चिटपाखरूही आढळून येत नाही. अशात या वस्त्यांतून अवैध धंद्यांना किंवा गुन्हेगारीला वाव मिळण्याची शक्यताही असते.

------------

प्रशासनाकडे नोंद नाही

रोजगारासाठी परराज्यात किंवा परजिल्ह्यात होणाऱ्या स्थलांतरांतून विविध समस्याही उद्भवतात. त्यात स्थलांतरित कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधकारमय होत असून, काहीवेळा परराज्यात कामासाठी गेलेल्या मजुरांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या. शिवाय आपत्कालीन स्थितीत या कामगारांना आपल्या घराकडे परतणेही कठीण होते. त्यामुळे अशा कामगारांची नोंदणी करणे आवश्यक असतानाही प्रशासनाकडून तशी नोंदच घेतली जात नाही.

-----------

लॉकडाऊन काळात परतले होते ८० हजार कामगार

देशात कोरोना संसर्गाचा शिरकाव होताच शासनाने २३ मार्चपासून लॉकडाऊन जारी केले, आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक बंद केली. त्यात लॉकडाऊनमुळे रोजगार बंद पडल्याने परराज्यात किंवा परजिल्ह्यात अडकलेल्या कामगारांसह त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळी आली होती. त्यामुळे हजारो कामगारांनी त्यांच्या चिमुकल्यांसह हजारो, शेकडो किलोमीटरचा प्रवास रानावनातून, उन्हातान्हातून पायीच केल्याचे चित्रही दिसले. गतवर्षी प्रशासनाने सुविधा उपलब्ध करेपर्यंत ८० हजार कामगार जिल्ह्यात परतले होते.

===Photopath===

140121\14wsm_1_14012021_35.jpg

===Caption===

खरीप हंगाम संपताच मजुरांचे स्थलांतर