शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

खरीप हंगाम संपताच मजुरांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:33 IST

वाशिम जिल्ह्यात उद्योग व्यवसायांची वाणवा आहे. प्रामुख्याने शेतीआधारित कामांवर जिल्ह्यातील ७० टक्के कामगारांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. त्यातही जिल्ह्यात कोरडवाहू ...

वाशिम जिल्ह्यात उद्योग व्यवसायांची वाणवा आहे. प्रामुख्याने शेतीआधारित कामांवर जिल्ह्यातील ७० टक्के कामगारांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. त्यातही जिल्ह्यात कोरडवाहू शेतीचे क्षेत्रच अधिक असल्याने खरीप हंगामानंतर रोजगाराची समस्या गंभीर होते. परिणामी, कामगारांना रोजगारासाठी परराज्यात, महानगरात स्थलांतर करावे लागते. कामगार कुटुंबांसह स्थलांतर करीत असल्याने त्यांच्या मुलांच्या शिक्षणावरही सातत्याने परिणाम होतो. आता खरीप हंगामातील कामे आटोपली असून, रब्बी हंगामात शेतात हरभरा काढणीशिवाय दुसरे कोणतेही काम उरले नाही. त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे यंदाही कामगारांनी रोजगाराच्या शोधात स्थलांतर सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हजारो कामगारांनी घराला कुलूप ठोकून मुलाबाळांसह परराज्यात, महानगराकडे प्रस्थान केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

-----------

वस्त्या पडू लागल्या ओस

जिल्ह्यात रोजगाराचा अभाव असल्याने हजारो मजुरांनी रोजगारासाठी परराज्यात किंवा महानगरात धाव घेतली आहे. त्यामुळे विविध गावांतील वस्त्याच ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रोजगाराच्या शोधात गेलेल्या कामगारांनी घराला टाळेच लावले आहे. त्यामुळे या वस्त्यांत शुकशुकाट दिसत आहे. या ओस पडलेल्या वस्त्यात चिटपाखरूही आढळून येत नाही. अशात या वस्त्यांतून अवैध धंद्यांना किंवा गुन्हेगारीला वाव मिळण्याची शक्यताही असते.

------------

प्रशासनाकडे नोंद नाही

रोजगारासाठी परराज्यात किंवा परजिल्ह्यात होणाऱ्या स्थलांतरांतून विविध समस्याही उद्भवतात. त्यात स्थलांतरित कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधकारमय होत असून, काहीवेळा परराज्यात कामासाठी गेलेल्या मजुरांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या. शिवाय आपत्कालीन स्थितीत या कामगारांना आपल्या घराकडे परतणेही कठीण होते. त्यामुळे अशा कामगारांची नोंदणी करणे आवश्यक असतानाही प्रशासनाकडून तशी नोंदच घेतली जात नाही.

-----------

लॉकडाऊन काळात परतले होते ८० हजार कामगार

देशात कोरोना संसर्गाचा शिरकाव होताच शासनाने २३ मार्चपासून लॉकडाऊन जारी केले, आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक बंद केली. त्यात लॉकडाऊनमुळे रोजगार बंद पडल्याने परराज्यात किंवा परजिल्ह्यात अडकलेल्या कामगारांसह त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळी आली होती. त्यामुळे हजारो कामगारांनी त्यांच्या चिमुकल्यांसह हजारो, शेकडो किलोमीटरचा प्रवास रानावनातून, उन्हातान्हातून पायीच केल्याचे चित्रही दिसले. गतवर्षी प्रशासनाने सुविधा उपलब्ध करेपर्यंत ८० हजार कामगार जिल्ह्यात परतले होते.

===Photopath===

140121\14wsm_1_14012021_35.jpg

===Caption===

खरीप हंगाम संपताच मजुरांचे स्थलांतर