शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
5
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
6
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
7
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
8
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
9
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
10
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
11
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
12
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
13
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
14
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
15
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
16
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
17
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
18
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
19
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
20
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!

‘रोहयो, ग्रामीण रस्ते, जलजीवन मिशन’वर घमासान; जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्य आक्रमक

By संतोष वानखडे | Updated: March 5, 2024 20:19 IST

दोन वर्षे उलटूनही ग्रामीण रस्त्यांना क्रमांक मिळण्याबाबतच्या ठरावाची अंमलबजावणी होत नसेल तर ठरावाला महत्व काय? असा प्रश्नही सदस्यांनी उपस्थित केला

वाशिम: रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना वेळेवर मजुरी मिळत नाही, ठराव मंजूर होऊनही ग्रामीण रस्त्यांना क्रमांक मिळत नाही, जलजीवन मिशन अंतर्गतच्या कामाकडे कंत्राटदार गांभीर्याने पाहण्यास तयार नाहीत अशा एक ना अनेक मुद्यांवरून सदस्यांनी मंगळवारी (दि.५) जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आक्रमक पवित्रा घेतला.

जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात पार पडलेल्या सर्वसाधारण सभेचे पिठासीन अध्यक्ष म्हणून जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे होते. मंचावर उपाध्यक्ष चक्रधर गोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, सभापती सर्वश्री अशोकराव डोंगरदिवे, सुरेश मापारी, वैभव सरनाईक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे आदींची उपस्थिती होती. सभेच्या सुरूवातीलाच रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिर, गोठा किंवा अन्य कामे करूनही मजुरांना वेळेवर मजुरी मिळत नसेल तर ही बाब लाजिरवाणी व संतापजनक असल्याचा मुद्दा जि.प. सदस्य डाॅ. सुधीर कवर यांनी उपस्थित केला. रोहयोसंदर्भातील ‘लोकमत’च्या वृत्ताचा उल्लेख करीत रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना तातडीने मजुरी मिळावी, अशी आक्रमक भूमिका मांडली. पीटीओ व रोजगार सेवक जर मस्टर टाकण्यासाठी लाभार्थींना पैशाची मागणी करीत असतील तर हा प्रकार कदापिही खपवून घेतला जाणार नसल्याचेही डाॅ. कवर यांनी ठणकावून सांगितले. १५ व्या वित्त आयोगांतर्गत सन २०२४-२५ च्या आराखड्यास मंजुरी देण्याबाबतही चर्चा झाली. सन २०२१-२२ या वर्षात ग्रामीण भागातील ज्या रस्त्यांना क्रमांक नाहीत, अशा रस्त्यांना क्रमांक मिळावे म्हणून सभागृहाने ठराव घेतला होता, त्या ठरावाच्या अंमलबजावणीबाबत दिलीप देशमुख, डाॅ. सुधीर कवर, सुनिल चंदनशीव, उमेश ठाकरे, आर.के. राठोड आदींनी प्रश्न उपस्थित केले.

दोन वर्षे उलटूनही ग्रामीण रस्त्यांना क्रमांक मिळण्याबाबतच्या ठरावाची अंमलबजावणी होत नसेल तर ठरावाला महत्व काय? असा प्रश्नही सदस्यांनी उपस्थित केला. उपाध्यक्ष चक्रधर गोटे यांनीदेखील शेतकरी व ग्रामीण जनतेसाठी ग्रामीण रस्ते अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगून बांधकाम विभागाने हा प्रश्न तातडीने निकाली काढण्याच्या सूचना केल्या तसेच प्रत्येक सर्कलमधील किमान १० रस्ते मार्गी लावावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. यावर जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी ग्रामीण रस्त्यांचा प्रश्न सर्वांच्याच जिव्हाळ्याशी संबंधित असल्याने बांधकाम विभागाने तातडीने कार्यवाही करावी, असे आदेश देतानाच विद्यमान सदस्यांनी प्रत्येक सर्कलमधील ५ रस्ते सुचवावे, अशी सूचना केली. येत्या १० ते १५ दिवसांत ग्रामीण रस्त्यांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची ग्वाही कार्यकारी अभियंता आनंद राजुस्कर यांनी दिली. दुपारी २ वाजताच्या सुमारास सुरू झालेली सर्वसाधारण सभा सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालली आहे.

टॅग्स :washimवाशिम