शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

बाजार समित्यांमधील ओट्यांवर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचा माल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 6:22 PM

वाशिम : जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील ओट्यांवर शेतकºयांऐवजी व्यापाºयांचा शेतमाल ठेवला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील ओट्यांवर शेतकºयांऐवजी व्यापाºयांचा शेतमाल ठेवला जात आहे. परिणामी, ओट्याखाली शेतकºयांच्या शेतमालाची हर्रासी करताना शेतमालाची नासाडी होते. ओट्यावरून व्यापाºयांचा शेतमाल हटवा, अशी मागणी वारंवार करण्यात आलेली असतानाही अद्याप यावर कुठलीच कार्यवाही न झाल्याने शेतकºयांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.जिल्ह्यात वाशिम, रिसोड, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर व मालेगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समित्या असून, त्याअंतर्गत जवळपास १० ठिकाणी उपबाजार समित्या आहेत. प्रत्येक बाजार समितीत शेतमालाची हर्रासी करण्यासाठी तसेच शेतकºयांचा शेतमाल ठेवण्यासाठी ओट्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र, या ओट्यांवर शेतकºयांऐवजी व्यापाºयांचाच शेतमाल ठेवला जात असल्याने ओट्याखाली शेतकºयांचा शेतमाल ठेवण्याची वेळ आली आहे. ओट्यावरून व्यापाºयांचा शेतमाल हटविण्यात यावा, या मागणीसाठी शेतकºयांसह संचालकांनीदेखील यापूर्वी आंदोलन केले होते. त्याची दखल घेत बाजार समिती प्रशासनाने व्यापाºयांचा शेतमाल हटविला होता. आता पुन्हा ओट्यांवर व्यापाºयांचाच शेतमाल ठेवला जात आहे. याविरोधात रिसोड येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजयराव गाडे, घनश्याम मापारी यांनी आवाज उठविला आहे. ओट्यावरून व्यापाºयांचा शेतमाल न हटविल्यास ठिय्या आंदोलनाचा इशाराही दिला आहे. हीच परिस्थित अन्य बाजार समितीतही असल्याने ओट्यावरून व्यापाºयांचा शेतमाल हटविण्यात यावा, या मागणीसाठी शेतकरी व संचालक पुढे येत आहेत. ...तर टाळता येईल नासाडीओट्यांवर व्यापाºयांचा शेतमाल असल्याने ओट्याखाली शेतकºयांचा शेतमाल ठेवून तेथे हर्रासी केली जाते. ओट्याखाली शेतमाल टाकताना दोन ते तीन किलोदरम्यान शेतमालाची नासाडी होते. याचा आर्थिक फटका शेतकºयांना बसत आहे. ओट्यावर हर्रासी झाली तर शेतमालाची नासाडी होणार नाही. अवकाळी पाऊस आला तर ओट्याखालील शेतमालाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते, याचा अनुभव यापूर्वी शेतकºयांना आला आहे. त्यामुळे ओट्यावरून व्यापाºयांचा शेतमाल हटविणे आवश्यक ठरत आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकºयांचा शेतमाल ठेवण्यासाठी ओट्यांची व्यवस्था केली जाते. या ओट्यांवर शेतकºयांचा शेतमाल ठेवणे आवश्यक आहे. या ओट्यांवर शेतकºयांऐवजी व्यापाºयांचा शेतमाल ठेवला जात असेल तर याप्रकरणी चौकशी करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेना दिल्या जातील. व्यापाºयांनीदेखील ओट्यावर शेतमाल ठेवू नये.रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, वाशिम

 ओट्यावरून व्यापाºयांचा शेतमाल हटविण्यासंदर्भात रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन संचालकांचे निवेदन प्राप्त झाले आहे. ओट्यावर व्यापाºयांचा शेतमाल राहत असल्याने शेतकºयांची गैरसोय होते, असा या निवेदनाचा आशय आहे. या विषयावर चर्चा झाली असून, लवकरच यशस्वी तोडगा काढण्यात येईल. शेतकºयांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.- विजय देशमुख, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, रिसोड

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिमFarmerशेतकरी