शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मंगरूळपीर तालुक्याची आणेवारी ४६ पैसे

By admin | Updated: November 16, 2014 23:56 IST

मंगरुळपीर तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करण्याची शेतक-यांची मागणी.

साहेबराव राठोड /मंगरुळपीर

        यंदाच्या अत्यल्प पावसामुळे तालुक्यात दुष्काळी परिस्थीती निर्माण झाली असुन प्रशासनाने नुकतेच जाहीर केलेल्या सुधारीत आणेवारी ४६ पैसे आहे. आणेवारी ५0 पैसे पेश्यापेक्षा कमी असल्याने तालुका दुष्काळ घोषीत करावे अशी मागणी दुष्काळात होरपळणार्‍या शेतकर्‍यांनी केली आहे. यावर्षी तालुक्यात सुरूवाती पासुनच पावसाची सरासरी अत्यंत कमी आहे.मृग नक्षत्र कोरडा गेल्या नंतर उशीरा पेरण्या झाल्या होत्या त्यानंतरही वरूणराजानी डोळे वटारल्याने शेतकर्‍यांवर दुबार तिबार पेरण्या करण्याचा प्रसंग ओढावला होता शासनाकडुन दुबार पेरणीची मदत मिळाली नाही.आधी बॅकेचे कर्ज त्यानंतर सावकारा कडुन कर्ज घेवुन शेतकर्‍यांनी पेरण्या पुर्ण केल्या तरी देखील निर्सगाने साथ दिली नाही ऐन गरजेच्या वेळी वरूण राजांनी पाठ फिरवल्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांच्या मुख्य सोयाबीन पिकाच्या उत्पादनात प्रचंड इतकी घट पाहावयास मिळाली.यंदाचा खरीप हंगाम शेतकर्‍यांसाठी शापीत ठरला आहे.तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने रब्बी हंगाम सुध्दा कोरडा जाण्याची शक्यता व र्तविण्यात येत आहे.विहीरीची तसेच बोअरवेलच्या पाण्याच्या पातळी कमालीची खालावल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शिवाय दरवर्षी रब्बी हंगामाला शे तकर्‍यांना हातभार लावणारे लहान मोठे प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे त.खरीप हंगामाच्या उत्पादनावर परिणाम तर झालाच त्याच बरोबर तालुक्यावर जलसंकट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.जिल्हय़ातील दोन तालुके वगळता इतर तालुके आघाडी शासनाने दुष्काळ घोषीत केले होते.मात्र त्यावेळी मंगरूळपीर तालुक्याची परिस्थीती गंभीर असतांनाही दुष्काळाच्या यादीतुन वगळण्यात आले होते.आता या तालुक्याची सुधारीत आणेवारी ४६ पैसे असल्याने शासनाने विनाविलंब तालुक्याला दुष्काळ घोषीत करा अशी मागणी आर्थीक विवंचनेत सा पडलेल्या शेतकर्‍यांनी केली आहे. महसुल विभागाच्या वतीने सुधारीत आणेवारी ४६ पैसे इतकी जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आली पुढील अंतिम आणेवारी ही १५ जानेवारीला जाहीर होणार आहे.त्यानंतरच शासनाकडुन दुष्काळ घोषीत करण्याचा निर्णय होऊ शके ल, असे मंगरूळपीरचे नायब तससिलदार विजय साळवे यांनी लोकमत प्र ितनिधीशी बोलताना स्पष्ट केले.