शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
4
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
5
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
6
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
7
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
8
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

मालेगावात उन्हाच्या झळा तीव, रस्ते झाले निर्मनुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 2:40 PM

मालेगाव : तालुक्यातील उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असून, तापमाना ४२ अंशाच्यावर पोहोचल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, रस्तेही निर्मनुष्य झाले आहेत.

ठळक मुद्दे नागरिक अत्यंत महत्त्वाचे काम करण्यासाठी घराबाहेर निघताना काळजी घेत आहेत. उष्माघातापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी शेले, टोप्यांचा वापर. दुपारी १२ वाजतापासून सायंकाळी ४.३० पर्यंत शहरातील रस्ते ओस पडत असल्याचे चित्र आहे.

 मालेगाव : तालुक्यातील उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असून, तापमाना ४२ अंशाच्यावर पोहोचल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, रस्तेही निर्मनुष्य झाले आहेत. या वातावरणाचा परिणात दिवसा चालणाºया विविध व्यवसायांवर होत असल्याचे दिसत आहे.  उन्हाच्या लाटेमुळे जिवाची लाही लाही होत आहे. त्यामुुळे नागरिक अत्यंत महत्त्वाचे काम करण्यासाठी घराबाहेर निघताना काळजी घेत आहेत. उष्माघातापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी शेले, टोप्यांचा वापर होत असून, घशाला पडलेली कोरड मिटविण्यासाठी थंडपेयांचा आधार घेतला जात आहे. संपूर्ण मालेगाव तालुक्यात उष्णतेची लाट असून, दुपारी १२ वाजतापासून सायंकाळी ४.३० पर्यंत शहरातील रस्ते ओस पडत असल्याचे चित्र आहे. प्रत्येकजण सावलीचा आधार घेताना दिसतो. उन्हामुळे सावलीत बसूनही झळा सोसणे कठीण होत असून, यामुळे होणारा त्रास टाळण्यासाठी नागरिक गारवा असेल त्या ठिकाणीच उभे राहणे पसंत करीत आहेत. उन्हाच्या लाटेमुळे एव्हाना वर्षभर गजबजून राहत असलेली शासकीय कार्यालयेही ओस पडल्याचे दिसत आहे.  उपाहारगृहे पडली ओसवाढत्या तापमानामुळे  दुपट्टे व रुमाल गुंडाळून घराबाहेर पडावे लागत आहे. दुपारच्या वेळेत सहसा महत्त्वाचे काम वगळता इतर कामांसाठी बाहेर पडण्यास नागरिक तयार नाहीत. तालुक्यातील खेड्यांपाड्यांतूनही कामानिमित्त येणाºया ग्रामस्थांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी उपहारगृहेही ओस पडली असून, दिवसभर फरसान आणि फराळाचे इतर पदार्थ विकून गुजराण करणाºयांवर उपासमारीचीच पाळी आली आहे. चहाची मागणी घटून शीतपेयाची मागणी वाढली असली तरी, दुपारच्या वेळेत शीतपेयांच्या दुकानांतही नावापुरतेच ग्राहक पाहायला मिळत आहेत. सायंकाळी ५ वाजतानंतर मात्र आंब्याचा रस, उसाचा रस, ताक, लस्सी, निंबू सरबत घेण्यासाठी चौकात असलेल्या दुकानांमध्ये, हातगाड्यावंर लोकांची गर्दी दिसत आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवwashimवाशिमHeat Strokeउष्माघात