शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्याच्या अपूर्ण कामामुळे शेतीचे सात लाख रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:27 IST

मंगरूळपीर : जलसंधारण विभागाने बंधाऱ्याचे काम अपूर्ण ठेवल्याने पावसाचे पाणी शेतात घुसून शेतजमीन खरडून गेल्यामुळे सात लाख रुपयांचे नुकसान ...

मंगरूळपीर : जलसंधारण विभागाने बंधाऱ्याचे काम अपूर्ण ठेवल्याने पावसाचे पाणी शेतात घुसून शेतजमीन खरडून गेल्यामुळे सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार तालुक्यातील गणेशपूर येथील शेतकरी शंकर खोडके यांनी उपविभागीय अधिकारी व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.

गणेशपूर येथील गट नं. ४ / ३ मधील शेती क्षेत्र २ हे. ४० आर शेतजमीन अर्जदाराचे वहितीत व ताब्यात आहे. या जमिनीत मागील वर्षी एप्रिल - मे २०२१ मध्ये जल संधारण विभाग मंगरूळपीरमार्फत बांध करण्याचे काम सुरू आहे. हे काम संबंधित विभागाने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून बंधारा व्यवस्थित केला नाही. बंधाऱ्यामध्ये आज रोजीसुद्धा भरपूर माती असून संपूर्ण शेतात गिट्टी, डस्ट पडलेली आहे. १० जून २०२१ रोजी रात्री व १२ जून २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे सदरहू बंधारा पूर्णपणे न बांधल्यामुळे संपूर्ण पावसाचे पाणी माझ्या शेतातून वाहिले आहे. त्यामुळे माझी संपूर्ण जमीन खरडून गेली असून पेरणीयोग्य राहिलेली नाही. त्यामुळे मला या वर्षीच्या पेरणीच्या हंगामात पेरणी करता येत नाही. माझे अतोनात आर्थिक नुकसान झाले असून, त्यामुळे माझ्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येणार आहे. आज रोजी शेतात पावसाच्या पाण्याने तळे साचलेले आहे. जल संधारण विभागाने पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्याचे काम पूर्ण केले नाही व बंधाऱ्यामधील माती व गाळ व्यवस्थित उपसला नाही. पावसाचे पाणी वाहून जाण्याकरिता व्यवस्था केली नाही व बंधाऱ्याच्या बांधकामाकरिता आणलेली गिट्टी व डस्ट पावसाळ्यापूर्वी उचलून नेली नाही व ती शेतातच पडू दिली. दिनांक १० व १२ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे माझ्या शेतातच पाणी साचून वाट मिळेल तिकडे फुटले व त्यामध्ये माझी संपूर्ण शेतजमीन खरडून गेली. ती जमीन पेरण्यायोग्य राहिलेली नाही व जल संधारण विभागाने बंधारा बांधकामासाठी आलेली गिट्टी व डस्ट आज रोजीसुद्धा शेतातच पडलेली आहे. माझ्या संपूर्ण शेतात तळे साचून पाणी साचले असल्यामुळे मी शेतात पेरणी करू शकत नाही. त्यामुळे माझे अंदाजे सात लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. याची आपल्या विभागामार्फत पाहणी व चौकशी करून माझ्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून द्यावी; अन्यथा माझ्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येईल व मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे तक्रारीत नमूद आहे.