शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

मानोरा तालुक्यात खरीप हंगामाची कामे अंतिम टप्प्यात

By admin | Updated: June 21, 2014 00:34 IST

शेतकर्‍यांना पाण्याची प्रतीक्षा: आर्थिक जुळवाजुळव सुरू

मानोरा : लग्नसराई शेवटच्या टप्प्यात असून उन्हाळा संपत आल्याने तोंडावर आलेल्या खरीप हंगामाच्या दृष्टीने खरीप हंगामाच्या तयारीची शेती कामे अंतिम टप्प्यात सुरू आहेत.शेती पावसाळ्याअगोदर पेरणीकरिता तयार व्हावी म्हणून तालुक्यात नांगरणी, कचरा वेचणे, बी-बियाणे, अवजारे यांची जुळवाजुळव करण्यात शेतकरी गुंतले आहेत.तालुक्यात सिंचन प्रकल्पांची संख्या अत्यल्प असल्यामुळे शेतकर्‍यांना निसर्गाच्या भरवशावर राहूनच आपली शेती करावी लागते. उडीद, मूग, सोयाबीन, कपाशी व तूर ही तालुक्यातील शेतकर्‍यांची प्रमुख पीके असून या दृष्टीने बहुतांश शेतकर्‍याकरिता खरीप हंगाम हा अतिशय महत्वाचा आहे. खरीपातील पिकांच्या भरवशावर अनेक शेतकर्‍यांचे वर्षाचे आर्थिक व्यवहाराचे गणित अवलंबून असते. त्यामुळे बळीराजा या दृष्टीने कामाला लागला आहे.पूर्वी असलेली पारंपरिक शेती करण्याची पद्धत बंद झाली असून नांगरणी व इतर कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने यंत्राने करण्याकडे शेतकरी वळला आहे. बैलांची कमतरता व घाम गाळून काम करण्याची पहिल्यासारखी शेतमजुरांची मनस्थिती न राहिल्याने यंत्रणाच्या सहाय्याने सर्व कामे उरकून घेण्यात शेतकरी मग्न आहे. आजमितीला सालदार व्यवस्था संपुष्टात आली असून रोजंदारीनेही कोणी कामाला यायला तयार नसल्यामुळे जास्तीत जास्त करुन यंत्रांवरच अवलंबून राहण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.