शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
3
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
4
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
5
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
6
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
7
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
8
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
9
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
10
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
11
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
20
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा तालुक्यात खरीप हंगामाची कामे अंतिम टप्प्यात

By admin | Updated: June 21, 2014 00:34 IST

शेतकर्‍यांना पाण्याची प्रतीक्षा: आर्थिक जुळवाजुळव सुरू

मानोरा : लग्नसराई शेवटच्या टप्प्यात असून उन्हाळा संपत आल्याने तोंडावर आलेल्या खरीप हंगामाच्या दृष्टीने खरीप हंगामाच्या तयारीची शेती कामे अंतिम टप्प्यात सुरू आहेत.शेती पावसाळ्याअगोदर पेरणीकरिता तयार व्हावी म्हणून तालुक्यात नांगरणी, कचरा वेचणे, बी-बियाणे, अवजारे यांची जुळवाजुळव करण्यात शेतकरी गुंतले आहेत.तालुक्यात सिंचन प्रकल्पांची संख्या अत्यल्प असल्यामुळे शेतकर्‍यांना निसर्गाच्या भरवशावर राहूनच आपली शेती करावी लागते. उडीद, मूग, सोयाबीन, कपाशी व तूर ही तालुक्यातील शेतकर्‍यांची प्रमुख पीके असून या दृष्टीने बहुतांश शेतकर्‍याकरिता खरीप हंगाम हा अतिशय महत्वाचा आहे. खरीपातील पिकांच्या भरवशावर अनेक शेतकर्‍यांचे वर्षाचे आर्थिक व्यवहाराचे गणित अवलंबून असते. त्यामुळे बळीराजा या दृष्टीने कामाला लागला आहे.पूर्वी असलेली पारंपरिक शेती करण्याची पद्धत बंद झाली असून नांगरणी व इतर कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने यंत्राने करण्याकडे शेतकरी वळला आहे. बैलांची कमतरता व घाम गाळून काम करण्याची पहिल्यासारखी शेतमजुरांची मनस्थिती न राहिल्याने यंत्रणाच्या सहाय्याने सर्व कामे उरकून घेण्यात शेतकरी मग्न आहे. आजमितीला सालदार व्यवस्था संपुष्टात आली असून रोजंदारीनेही कोणी कामाला यायला तयार नसल्यामुळे जास्तीत जास्त करुन यंत्रांवरच अवलंबून राहण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.