शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

‘लालपरी’ला लागले तांत्रिक बिघाडाचे ग्रहण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 2:52 PM

वाशिम: जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसगाड्यांना तांत्रिक बिघाडाचे जणू ग्रहणच लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसगाड्यांना तांत्रिक बिघाडाचे जणू ग्रहणच लागले आहे. या बसगाड्या वारंवार प्रवासादरम्यान मार्गावरच बंद पडत आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसत असून, बसफेरी सोडण्यापूर्वी तपासणी होत नसल्याने हे प्रकार घडत असल्याचे स्पष्ट होत आहे. रविवारीही मंगरुळपीर आगाराची मंगरुळपीर-शिर्डी ही बस १२ किलोमीटर धावल्यानंतर रस्त्यातच बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना अमरावती-बार्शी या बसमध्ये वाशिमपर्यंत जावे लागले.वाशिम जिल्ह्यात वाशिम, मंगरुळपीर, कारंजा आणि रिसोड, हे चार आगार आहेत. या चारही आगारात मिळून दरदिवशी शेकडो बस विविध ठिकाणी धावत असतात; परंतु यातील अनेक बसगाड्यांची अवस्था गंभीर आहे. त्यामुळे या बसगाड्या आगारातून निघाल्यानंतर मार्गावर मध्येच बंद पडतात. जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत १५ पेक्षा अधिक वेळा बसगाड्या मार्गावर बंद पडल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावर ताटकळत बसावे लागले. रविवारीही मंगरुळपीर आगाराची एमएच=४०, वाय-५६१२ क्रमांकाची मंगरुळपीर-शिर्डी ही बस आगारातून वाशिमकडे निघाली. तथापि, धानोरा खु. येथून थोडी पुढे आल्यानंतर अचानक तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना खाली उतरावे लागले. सुदैवाने १० मिनिटांतच अमरावती आगाराची अमरावती-बार्शी ही बस तेथे आल्यानंतर प्रवाशांना त्यात बसून वाशिमकडे येणे शक्य झाले.

प्रवाशांसह एसटीच्या आर्थिक हानीची जबाबदारी कोणाची ?राज्य परिवहन महामंडळाच्या बसफेऱ्या मार्गावर बंद पडत असल्याने महत्त्वाचे शासकीय कामकाज, परिक्षेसाठी जाणाऱ्यांचे नुकसान होण्याची भिती असते, तसेच उपचारासाठी जाणाºया रुग्णाचा जीवही धोक्यात येण्याची शक्यता असते. त्याशिवाय बसफेरी बंद पडल्याने संबंधित आगाराचे आणि पर्यायाने एसटीचे आर्थिक नुकसानही होते. या सर्व गंभीरबाबींची दखल घेतली जात नाही. त्यामुळे या हानीची जबाबदारी कोणाची हा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.

आमच्या आगारात ५५ बसगाड्या आहेत. सर्व गाड्यांची स्थिती चांगली असून, या बस सोडण्यापूर्वी आगारात तपासणी होेते. तथापि, गिअर बॉक्समधील बिघाड किंवा इतर आकस्मिक तांत्रिक कारणांमुळे मार्गावर बस बंद पडू शकतात.- विनोद ईलामेआगार व्यवस्थापक,वाशिम

आमच्या आगारात ४६ बसगाड्या आहेत. सर्व गाड्यांची स्थिती चांगली असून, या बस सोडण्यापूर्वी आगारात तपासणी होेते. रस्त्यांची अवस्था वाईट असल्याने गाड्यांत बिघाडोत आहेत. त्याशिवाय इतर आकस्मिक तांत्रिक कारणांमुळे मार्गावर बस बंद पडू शकतात.- अकिल मिर्झाआगार व्यवस्थापक, मंगरुळपीर

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटी