शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

संथारा बंदीविरुद्ध जैन समाज एकवटला!

By admin | Updated: August 25, 2015 02:31 IST

शांततेत मूक मोर्चा काढून नोंदविला निषेध; जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रशासनाला दिले निवेदन.

वाशिम : सल्लेखना/संथारा (समाधी मरण) व्रत परंपरेला राजस्थान उच्च न्यायालयाने बंदी घातली. यामुळे जैनधर्मियांच्या भावना दुखावल्या असून, न्यायालयाने या निर्णयाचा फेरविचार करावा, या मागणीसाठी जिल्ह्यात सर्वत्र सोमवार, २४ ऑगस्ट रोजी सकल जैन समाजबांधवांनी मूक मोर्चा काढून शांततेच्या मार्गाने निषेध नोंदविला. राजस्थान उच्च न्यायालयाने दिलेल्या संथारा प्रथा बंदीच्या निकालाविरुध्द सकल जैन समाजाच्या वतीने सोमवारी काढण्यात आलेला मूक मोर्चा उत्स्फूर्त ठरला. यावेळी वाशिम तालुक्यातील सकल जैन समाज बांधव, महिला भगीनी व युवतींनी मोर्चात हजेरी लावली. संपूर्ण दिवसभर सकल जैन समाजाने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. मोहमायेचा त्याग करुन दिक्षा घेतल्यानंतर जैन धर्माचे आचार्य, मुनीगण, संत, साधू, साध्वी आपल्या आत्मसाधनेत रममान्य होवून जीवनाच्या अंतिम क्षणात नश्‍वर शरीराचासुध्दा स्वेच्छेने त्याग करुन समाधी मरण अंगीकारतात. म्हणजे यालाच संथारा, सल्लेखना, समाधी मरण म्हणतात. हा प्रकार आत्महत्येत मोडत नाही; तर आत्मसाधनेत मोडतो. मात्र, राजस्थान उच्च न्यायालयाने संथारा, संलेखना व समाधी मरणाला आत्महत्येचे स्वरुप देवून तसा निकाल दिला. यामुळे सकल जैन समाजाच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचली आहे. याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण भारतात २४ ऑगस्टला प्रत्येक तालुका व जिल्हाठिकाणी मुकमोर्चाचे आयोजन करुन जिल्हाधिकारी व संबंधीतांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांमार्फत पंतप्रधान, मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना सुध्दा निवेदने पाठविण्यात आली. सकल जैन समाजाच्या वतीने रमेशचंद बज, विनोद गडेकर, प्रविण पाटणी, केशरचंद सावके, ङ्म्रेणीक भुरे, अनिल वाल्ले, प्रविण पाटणी, मनिष संचेती, शिखरचंद बागरेचा यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, सकाळी १0 वाजता नगर परिषद चौकस्थित महावीर भवन येथून मुकमोर्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी पुरुष मंडळींनी पांढरा पोषाख, महिलांनी केशरी रंगाची साडी व विद्यार्थ्यांनी शालेय गणवेश परिधान करुन मोर्चात सहभाग नोंदविला. हा मोर्चा रमेश टॉकीज, सुभाष चौक, काटीवेश, बालुचौक, शिवाजीचौक, रविवार बाजार, पाटणी चौक, आंबेडकर चौक, पोलीस स्टेशन चौक, बसस्थानक, तहसील कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, राजस्थान महाविद्यालयमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. ठाणेदार रवींद्र देशमुख व त्यांच्या सहकार्‍यांनी मोर्चादरम्यान चोख बंदोबस्त ठेवला.