शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

कवितेतून वास्तव मांडणे गरजेचे - महेंद्र ताजणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 14:44 IST

आंंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते ,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाडमय व सांस्कृतीक संवर्धन मंचचे अध्यक्ष तथा विद्रोही कवी महेंद्र ताजणे त्यांच्याशी साधलेला हा संवाद...

- नंदकिशोर नारे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  मानवी जीवनमुल्यांचे सर्जक नक्षत्रं कवितेतून उगवतात. परंतु काही कविंनी उठबस कविता बनविणे सुरु केल्याने कविता नकोसे म्हणणारे अनेक जण आहेत. यामुळेच कवितेचा वाचक मर्यादित झालेला आहे. यासह तत्सम विषयांवर आंंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते ,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाडमय व सांस्कृतीक संवर्धन मंचचे अध्यक्ष तथा विद्रोही कवी महेंद्र ताजणे त्यांच्याशी साधलेला हा संवाद...

कविता उदंडपणे लिहिली जातेय, कवितेच्या दर्जाबद्दल काय सांगाल?मुलत: कविता लिहिणे ही अतिशय गंभीर प्रक्रीया आहे आणि असते. भोवतीच्या जळत्या अरण्यात जगण्याचे अनेक जळते प्रश्न निराधर झाले आहेत. कवितेच्या माध्यमातून हा जटिल गुंता सोडविता येऊ शकते. कवितेचं अविष्करण उदंड पातळीवर होत असलं आणि तिच्या दर्जेच्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित होत असले तरी आज लिहिली जाणारी कविता मला खूपच आश्वासक वाटते. आशय आणि रचनाबंधनेच्या पातळीवर विविधांगाने ती फुलत आहे. कवितेचा गाभा अथवा तिची मुल्यरचना अधिक सर्जनशिल होताना दिसते.

कवितेला बांधीलकी असू शकते का?कवी आणि कविची भूमिका या वेगळया दोन भूमिका असू शकत नाहीत. कविला कवितेतून वेगळं बाजुला काढता येत नाही. कविता हिच कविची भूमिका असते आणि कवी असणे ही सुध्दा एक भूमिकाच असते. भूमिकाविहिन कविता ही समुद्रात भरकटलेल्या नावेसारखी असते. दिशाहिनता जीवनाला विध्वंसक विवराकडे घेऊन जाते. दिशादर्शी कविता मानवी जीवनाला परिपूर्णत्वाकडे घेऊन जाते.

तुम्ही तुमच्या कविताकडे कसे बघता?मी कविता लिहितो म्हणजे माझ्या जखमी आयुष्याच्या तडफडीची जळती लिपी मी उदघोषित करीत असतो. व्यवस्थेने दिलेल्या सलत्या जखमा मला कविता लिहायला भाग पाडतात.

तुमच्या पुस्तकांना कोणते पुरस्कार मिळाले?पुरस्कार मिळण्यापेक्षा वाचकांच्या जया चांगल्या प्रतिक्रीया येतात तोच साहित्यीक, कवींसाठी उत्कृष्ट पुरस्कार असतो. तरी सुध्दा माझ्या ‘अस्वस्थ वर्तमानाच्या कविता’ संग्रहाला हिंगोली वाचनालयाच्या ‘मनोहर स्मृती पुरस्कार’ आणि ‘ग्लोबल महासत्तेचा इस्फोट’ या कविता संग्रहाला अमरावतीचा सुदाम सावरकर राज्यस्तरिय पुरस्कारा मिळाला आहे. यासह जिल्हास्तरावरील अनेक पुरस्कारांचा समावेश आहे.. मानवी जीवनाचा सर्वांगिण आशय कवितेतून उगविला तर कविता वाचाविसी वाटते. कविता म्हणजे काय तर आपल्याला जे आवडते ते इतरांनाही आवडावे अशी कलाकृती म्हणजे कविता होय. मग ती कोणत्याही विषयावर असून शकते. प्रेम कवी खूप आहेत वास्तव मांडणारे कवी हवे आहेत.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत