शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

सिंचन विहिर, फळबाग योजनेचा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 4:03 PM

मालेगाव: मनरेगा योजनेतून सिंचन विहीर, तसेच फळबाग लागवड योजनेसाठी दिला जाणारा निधी हा थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देनिधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी राज्याचे रोहयो मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे करण्यात आली होती. मागणीची दखल रोहयो मंत्र्यांनी घेतली असून, शासनाने या मागणीनुसार अंमलबजावणी करण्याचे शासन निर्णयाद्वारे जाहीरही केले आहे. आता हा निधी शेतकºयांना मिळणार असल्याने त्याला योजनेचा थेट लाभ मिळू शकेल.

मालेगाव: मनरेगा योजनेतून सिंचन विहीर, तसेच फळबाग लागवड योजनेसाठी दिला जाणारा निधी हा थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रशासकीय दरबारी अनुदानासाठी हेलपाटे घेण्याची गरज भासणार नाही. ही माहिती रोजगार हमी योजना समितीचे वाशिम जिल्हा सदस्य तथा भाजप सरचिटणीस नितीन काळे यांनी दिली.मनरेगा योजनेंतर्गत सिंचन विहीर, तसेच फळबाग लागवड योजनेसाठी दिला जाणारा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी राज्याचे रोहयो मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे करण्यात आली होती. त्या मागणीची दखल रोहयो मंत्र्यांनी घेतली असून, शासनाने या मागणीनुसार अंमलबजावणी करण्याचे शासन निर्णयाद्वारे जाहीरही केले आहे. या निर्णयामुळे आता सिंचन विहिर आणि फळबाग लागवड योजनेतील गैरप्रकाराला आळा बसून, या योजनांचा अधिकाधिक फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. पूर्वी सिंचन विहीरींसाठीच्या साहित्य खरेदीचा निधी हा दुकानदारास तर फळबाग लागवडीचा निधी हा रोपवाटिकेला दिला जात होता. आता हा निधी शेतकºयांना मिळणार असल्याने त्याला योजनेचा थेट लाभ मिळू शकेल,अशी माहिती रोजगार हमी योजना समितीचे जिल्हा सदस्य तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस नितीन काळे यांनी दिली. या योजनेतील कुशल कामासाठीचा म्हणजे विहीर बांधकामासाठी लागणारे सिमेंट, वाळू, स्टील आदि साहित्य खरेदीचा निधी हा ग्रामपंचायतीमार्फत संबंधित व्यापारी तथा दुकानदारास दिला जात असे. पण आता हा निधी डीबीटीद्वार थेट शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनरेगाच्या खर्चातून खाजगी शेतात फळबाग लावली जाते. त्यातील उत्पन्नाचा लाभ संबंधित शेतकऱ्यांस मिळतो. या योजनेसाठी खरेदी करावयाच्या रोपांचा निधी आतापर्यंत संबंधित रोपवाटिकेला दिला जात असे. आता हा निधीही डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकºयांना ही रोपे सरकारी किवा नोंदणीकृत खासगी रोपवाटिकेतून खरेदी करता येतील.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजनाMalegaonमालेगांव