झटपट सोयाबीन; पाऊस कधीही झाला तरी शेतकरी मालामाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:47 IST2021-09-15T04:47:10+5:302021-09-15T04:47:10+5:30

वाशिम : सोयाबीनची नवनवी वाणं उपलब्ध होत असून, कमी दिवसात उत्पन्न हाती येईल, अशा वाणांकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल वाढत ...

Instant soybeans; Farmers' goods even when it rains! | झटपट सोयाबीन; पाऊस कधीही झाला तरी शेतकरी मालामाल!

झटपट सोयाबीन; पाऊस कधीही झाला तरी शेतकरी मालामाल!

वाशिम : सोयाबीनची नवनवी वाणं उपलब्ध होत असून, कमी दिवसात उत्पन्न हाती येईल, अशा वाणांकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात यंदा लवकर येणाऱ्या सोयाबीनचे क्षेत्र बऱ्यापैकी असून, सध्या या सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. ७ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास दर असल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.

जिल्ह्यात सोयाबीनची सर्वाधिक पेरणी होते. पेरणीखालील क्षेत्रात वाढ होत असल्याचे दिसून येते. गत चार, पाच वर्षांपासून सोयाबीन पिकाला ऐन सोंगणीच्या हंगामात पावसाचा फटका बसत आहे. शिवाय सोयाबीनचे तेच ते वाण घेतल्याने उत्पादनावरही परिणाम होतो. त्यामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांनी लवकर येणाऱ्या वाणाची पेरणी करण्याचा प्रयोग केला. कमी दिवसात येणारी सोयाबीन सोंगणी सध्या सुरू असून, बाजारात भावही ७ ते ७६०० हजार रुपये प्रतिक्विंटल असल्याने शेतकऱ्यांना तूर्तास तरी दिलासा मिळत आहे.

०००००००

झटपट येणारे सोयाबीन

लवकर येणाऱ्या सोयाबीन काढणीनंतर बाजारात सोयाबीनची आवक कमी असते, त्यामुळे भाव चांगला मिळतो. शेत लवकर रिकामे झाल्याने रबी हंगामाचे चांगले नियोजन होऊ शकते.

.....

मध्यम कालावधीत येणारे सोयाबीन

मध्यम कालावधीत येणारे सोयाबीनदेखील बऱ्यापैकी उत्पन्न देते. सोयाबीन काढल्यानंतरही जमिनीत ओलावा चांगला राहतो. इतर पिके घेण्यासाठी फायदा होतो.

......

जास्त कालावधीत येणारे सोयाबीन

जास्त कालावधीत येणारे सोयाबीन घेतले तर परतीच्या पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. शिवाय रबी हंगामात पेरणीसाठी जमीन सज्ज ठेवण्यासही विलंब होतो.

००००००

जिल्ह्यात वाढला सोयाबीनचा पेरा

२०१७ २७६०००

२०१८ २८००००

२०१९ २९२०००

२०२० २९४०००

२०२१ ३०२०००

००००००००००००००००

शेतकरी म्हणतात...

कमी कालावधीत येणारे सोयाबीन घेतल्यामुळे अनेक फायदे आहेत. परतीच्या पावसापासून नुकसान टाळले जाऊ शकते, तसेच बाजारभावही चांगला मिळतो. त्यामुळे या सोयाबीन पेरणीला पसंती दिली.

- गौतम भगत, शेतकरी, चिखली

.......

मध्यम कालावधीत येणारे सोयाबीन घेतले आहे. सध्या बाजारभावही बऱ्यापैकी आहेत. त्यामुळे या सोयाबीनला सहा हजारांपेक्षा अधिक भाव मिळू शकतो. उशिराने येणाऱ्या सोयाबीनला बाजारभाव कमी मिळण्याची शक्यता आहे.

- गणेश परिहार, शेतकरी, नागठाणा.

००००००००००

कृषी अधिकारी कोट

लवकर, मध्यम आणि उशिरा अशा तीन प्रकारचे सोयाबीन शेतकऱ्यांना घेता येते. त्यामुळे पाऊस केव्हाही आला तरी शेतकऱ्यांना सोयाबीन चांगले उत्पन्न देऊ शकते. सध्या लवकर येणाऱ्या सोयाबीनला चांगले दिवस आले आहेत. बाजारभावही चांगला मिळतो.

- एस.एम. तोटावार

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

Web Title: Instant soybeans; Farmers' goods even when it rains!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.