शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
2
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
3
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
4
Prithviraj Chavan : सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
5
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
6
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
7
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
8
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
9
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
10
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
11
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
12
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
13
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
14
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
15
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
16
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
17
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
18
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
20
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड

रब्बीत गहू, हरभरा खाणार भाव; करडई पिकालाही राहणार पसंती!

By संतोष वानखडे | Published: October 11, 2023 5:15 PM

कृषी विभागाचे पीक पेरणी नियोजन : पेरणीयोग्य १.१५ लाख हेक्टर क्षेत्र

वाशिम : यंदाच्या खरीप हंगामात निराशा झाल्यानंतर शेतकऱ्यांचे लक्ष आता रब्बी हंगामाकडे लागून आहे. रब्बी हंगामात यंदाही गहू, हरभऱ्यालाच सर्वाधिक पसंती राहणार असून, कृषी विभागाने त्यादृष्टीने १.१५ लाख हेक्टरवर नियोजन केले आहे.

यंदा मान्सूनचे विलंबाने आगमन झाल्याने खरीप हंगामात पेरण्याही उशिराने झाल्या होत्या. त्यानंतर पावसात सातत्य नसल्याने तसेच पिवळा मोझॅक व अन्य रोगराईमुळे सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरीप हंगामाने निराशा केल्यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त रब्बी हंगामातील पिकांवर आहे. परतीचा पाऊसही पाठ फिरवित असल्याने रब्बीत पिकांच्या सिंचनासाठी प्रकल्पांतून पुरेसे पाणी मिळणार की नाही? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी एक लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी होते.

यंदा १ लाख १५ हजार ७७० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक ७५ हजार हेक्टरच्या आसपास हरभरा पेरणीचा अंदाज वर्तविला आहे . सिंचनाची सुविधा असणारे शेतकरी गव्हाच्या पेरणीला प्राधान्य देतात. ३५ हजार हेक्टरच्या आसपास गव्हाची पेरणी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. कोरडवाहू पीक म्हणून ओळख असलेल्या करडईकडेही काही शेतकरी वळण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. याशिवाय मसूर, राजमा, सूर्यफूल, मोहरी या पिकांची पेरणी होण्याचा अंदाज आहे. मात्र, या पिकांखालील क्षेत्रफळ अत्यल्प राहिल, असे सांगण्यात येते.असे आहे रब्बी पीक पेरणीचे नियोजन (हेक्टर)पीक / नियोजन

गहू / ३५०००हरभरा  / ७५०००ज्वारी /  १८००करडई / १५००इतर तृणधान्य / ५००इतर कडधान्य / १५००इतर गळीतधान्य / ३५०

टॅग्स :Farmerशेतकरी