शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

१८ हजार बेघरांना मिळणार घर!

By admin | Updated: September 2, 2016 01:23 IST

प्रधानमंत्री आवास योजनेचा कृषी सभापतींनी घेतला आढावा.

वाशिम, दि. १ : प्रधानमंत्री आवास योजनेतून जिल्ह्यात सन २0१६-१७ या वर्षात १७ हजार ५00 घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले असून, ग्रामीण भागातील पात्र व बेघर कुटुंबीयांना या घरकुलांचा लाभ मिळावा म्हणून कृषी सभापतींनी ग्रामसेवकांशी चर्चा करून बुधवारी आढावा घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २0२२ पर्यंत ह्यसर्वांसाठी घरह्ण या संकल्पनेतून प्रधानमंत्री आवास योजना जाहीर केली आहे. त्या योजनेचा पहिला टप्पा २0१६-१७ ते २0१८-१९ पर्यंत आहे. नवीन घरकुल निर्माण करण्यासाठी ग्रामीण स्तरावर ग्रामसभेच्या माध्यमातून पात्र लाभार्थींंची यादी तयार करण्याचे काम सुरू असून, या यादीमध्ये गावातील गोरगरीब कुटुंबाला १00 टक्के लाभ मिळावा, म्हणून ग्रामपंचायत, पंचायत समिती स्तर व जिल्हास्तरीय ग्रामीण विकास यंत्रणेकडून योग्य मार्गदर्शन मिळावे, अशी अपेक्षा कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्‍वनाथ सानप यांनी व्यक्त केली. अनेक गावांमध्ये नवीन लाभार्थींचे नाव समाविष्ट करण्यात येत नसल्याचे निदर्शनात आले असून, ही गंभीर बाब असल्याचे सानप म्हणाले. शासन निर्णयातील अ, ब, क, ड अनुक्रमांकानुसार याद्या न बनविता जुन्याच याद्यांचे वाचन करून त्यातील पात्र लाभार्थीचा समावेश नवीन यादीमध्ये होत आहे. या योजनेबाबत इत्थंभूत माहिती नसल्याने पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. सदर योजनेतील पात्र लाभार्थींंना शासनामार्फत १ लाख २0 हजार रुपये रोख व ७0 हजार रुपयांपर्यंंत रक्कम कर्ज स्वरूपात मिळणार आहे. शासन निर्णयानुसार अनुक्रमांक ड प्रकारच्या यादीमध्ये नवीन पात्र लोकांचा समावेश होणे गरजेचे आहे. गावातील राजकीय मतभेद बाजूला सारून सरपंच व ग्रामसेवकांनी सर्व समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या व ज्यांना कच्चे घर आहे, अशा कुटुंबाना या योजनेत प्राधान्यक्रम देण्यात यावा, अशा सूचना सानप यांनी केल्या. या योजनेची माहिती व प्रसिद्धी करण्याकरिता विश्‍वनाथ सानप मित्रमंडळ हे गावोगावी फलक, पोस्टर व जनजागृती करून योग्य मार्गदर्शन करणार असल्याचे यावेळी सानप म्हणाले. यानंतरही या योजनेसंदर्भात काही अडचणी असल्यास रिसोड व मालेगाव तालुक्यातील संबंधित लाभार्थींंनी विश्‍वनाथ सानप यांचे जनसंपर्क कार्यालय व खासदार भावना गवळी यांचे जनसंपर्क कार्यालय रिसोड येथे संपर्क साधावा, असे आवाहन सभापती विश्‍वनाथ सानप यांनी केले.