शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

शाळांचे मुख्याध्यापक झाले ‘आॅनलाईन कारकून’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 4:35 PM

  वाशिम : शालार्थ प्रणालीअंतर्गत शाळांची बहुतांश कामे ‘आॅनलाईन’ झाली आहेत. त्याची संपूर्ण जबाबदारी मात्र शाळेतील मुख्याध्यापकांच्याच खांद्यावर सोपविण्यात आल्याने दिवसभरातील ‘बिझी शेड्युल्ड’मुळे विद्यार्थ्यांना शिकविणे त्यांच्यासाठी जिकीरीचे ठरत आहे.

ठळक मुद्दे शालार्थ प्रणालीअंतर्गत शाळांची बहुतांश कामे ‘आॅनलाईन’ झाली आहेत.९० टक्के शाळांमध्ये ‘नेट कनेक्टिव्हिटी’सह इतर तत्सम सुविधांचा अभाव असल्याने आॅनलाईन स्वरूपातील सर्व कामे शहरातील एखाद्या ‘सायबर कॅफे’वर बसून करावी लागतात. दिवसभरातील ‘बिझी शेड्युल्ड’मुळे विद्यार्थ्यांना शिकविणे त्यांच्यासाठी जिकीरीचे ठरत आहे.

 वाशिम : शालार्थ प्रणालीअंतर्गत शाळांची बहुतांश कामे ‘आॅनलाईन’ झाली आहेत. त्याची संपूर्ण जबाबदारी मात्र शाळेतील मुख्याध्यापकांच्याच खांद्यावर सोपविण्यात आल्याने दिवसभरातील ‘बिझी शेड्युल्ड’मुळे विद्यार्थ्यांना शिकविणे त्यांच्यासाठी जिकीरीचे ठरत आहे. याशिवाय डोक्यावर सततचा ताण राहत असल्याने त्यांच्यातून दबक्या आवाजात शासनाच्या धोरणाविरूद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाकडून शाळांसाठी पाठविला जाणारा पोषण आहार मोजून त्यांचे ‘रेकॉर्ड’ ठेवणे, त्याचा अहवाल शासनाकडे न चुकता वेळेत पाठविणे, विविध स्वरूपातील टपाल स्विकारणे आणि पाठविणे, इंटरनेटवरून विविध संकेतस्थळांवर शाळांची माहिती ‘अपलोड’ करणे यासह जिल्हा कोषागाराकडून थेट मुख्याध्यापकांच्या खात्यात शिक्षकांचा व्यवसायकर, गटविमा, एलआयसी, पतसंस्था कर्ज, बँकांचे कर्ज, सण अग्रीम, गृहकर्ज आदींची रक्कम वळती केली जात असल्याने यासंदर्भातील धनादेश त्या-त्या घटकाकडे सुपूर्द करणे आणि त्याचे ‘रेकॉर्ड’ ठेवणे, दर महिन्याला शिक्षकांचे पगारपत्रक तयार करून ते शालार्थ प्रणालीअंतर्गत ‘अपलोड’ करणे, अशी सर्व कामे मुख्याध्यापकांकडेच सोपविण्यात आलेली आहेत. विशेष गंभीर बाब म्हणजे जिल्ह्यातील ९० टक्के शाळांमध्ये ‘नेट कनेक्टिव्हिटी’सह इतर तत्सम सुविधांचा अभाव असल्याने आॅनलाईन स्वरूपातील सर्व कामे शहरातील एखाद्या ‘सायबर कॅफे’वर बसून करावी लागतात. यासाठी लागणाºया खर्चाचीही विशेष तरतूद नसल्यामुळे सर्वच शाळांचे मुख्याध्यापक त्रस्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.‘आॅनलाईन’ प्रणाली अंमलात येण्यापूर्वी शिक्षकांच्या पगारीसह इतर सर्व कामे ‘आॅफलाईन’ असताना त्या-त्या तालुक्यांमधील पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे होती; परंतू सद्या या सर्व कामांना मुख्याध्यापकांनाच न्याय द्यावा लागत असून त्यांचा बहुतांश वेळ या कामांमध्येच जात आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना शिकविण्याकडेही त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.  

कुठलाही मुख्याध्यापक हा त्या शाळेचा मुख्य अध्यापक असतो. मात्र, सद्य:स्थितीत सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांना शासनाने अक्षरश: आॅनलाईन कारकून केले असून जास्तीत जास्त कामे त्यांनाच करावी लागत आहे. त्यापेक्षा पुर्वीप्रमाणे पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे ही कामे सोपविल्यास मुख्याध्यापकांसोबतच शिक्षकांनाही फायदेशीर ठरेल. यासाठी संघटनेच्या माध्यमातून निश्चितपणे आवाज उठविला जाईल.- मंचकराव तायडे, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना

टॅग्स :washimवाशिमeducationशैक्षणिकTeacherशिक्षक