‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत राठी महाविद्यालयात हरितशपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:35 IST2021-01-17T04:35:26+5:302021-01-17T04:35:26+5:30
राठी विधी महाविद्यालयात आयोजित हरितशपथ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुशांत चिमणे, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. भाग्यश्री ...

‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत राठी महाविद्यालयात हरितशपथ
राठी विधी महाविद्यालयात आयोजित हरितशपथ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुशांत चिमणे, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. भाग्यश्री धुमाळे यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. चिमणे म्हणाले की, पर्यावरणाचा समतोल राखणे, ही प्रत्येकच व्यक्तीची जबाबदारी आहे. केवळ प्रसंगानुसार कार्य करण्यापेक्षा दैनंदिन जीवनात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. भविष्यातील स्थितीचा विचार करता पाण्याचा काटकसरीने वापर करावा, दैनंदिन जीवनातही पर्यावरणपूरक साधनांचा वापर करावा, धूरमुक्त पर्यावरणासाठी विविध संकल्पनांचा अभ्यास अंगिकारावा, रेनवॉटर हार्वेस्टिंग करून भूजलवाढीचे प्रयत्नही विद्यार्थ्यांनी करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मिलिंद कांबळे या विद्यार्थ्यानेही पर्यावरणाचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. सागर सोनी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन अविनाश खंदारे यांनी, तर आभार प्रदर्शन कविता मांगुळकर हिने केले. कार्यक्रमासाठी प्रा. संजय इढोळे, महादेव सोमाणी यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.