शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

ग्रामपंचायतींचा मासिक सभेला कोलदांडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 5:31 PM

वाशिम : जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये तेवढेच ग्रामसेवकांची नेमणूक असणे गरजेचे आहे. मात्र, सद्य:स्थितीत केवळ ३०३ ग्रामसेवकच कार्यरत असल्याने योजनांतर्गत कामांच्या अंमलबजावणीवर विपरित परिणाम होत आहे.

ठळक मुद्देअनेक ग्रामपंचायतींमध्ये कायमस्वरूपी सचिव नसून एकाच ग्रामसचिवाकडे तीन ते चार ग्रामपंचायतींचा कारभार सोपविला जातो.निधीचा योग्य विनियोग करण्याकामी आवश्यक ग्रामसेवकांची पदेच रिक्त असल्याने शासनाच्या मूळ उद्देशांना हरताळ फासला जात आहे.

वाशिम : जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये तेवढेच ग्रामसेवकांची नेमणूक असणे गरजेचे आहे. मात्र, सद्य:स्थितीत केवळ ३०३ ग्रामसेवकच कार्यरत असल्याने योजनांतर्गत कामांच्या अंमलबजावणीवर विपरित परिणाम होत आहे. विशेष बाब म्हणजे अनेक ग्रामपंचायतींमध्ये नियमानुसार मासिक सभा होत नसल्याने ग्रामविकासाला ‘ब्रेक’ लागला आहे. योजनांतर्गत कामकाजाची गती देखील कमी असल्यामुळे अपेक्षित विकास साध्य होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये कायमस्वरूपी सचिव नसून एकाच ग्रामसचिवाकडे तीन ते चार ग्रामपंचायतींचा कारभार सोपविला जातो. परिणामी, प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात समसमान लक्ष पुरवून ग्रामीण विकासाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये आजमितीस केवळ ३०३ ग्रामसेवक कार्यरत असून मोठ्या प्रमाणातील या अनुशेषामुळेच ग्रामविकासाचा बोजवारा उडत आहे. १४ व्या वित्त आयोगातून इतर कुठल्याही यंत्रणेच्या हस्तक्षेपाविना निधीचा विनियोग आणि योजनांची अंमलबजावणी करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींकडे सोपविण्यात आले आहेत. मात्र, ग्रामविकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून निधीचा योग्य विनियोग करण्याकामी आवश्यक ग्रामसेवकांची पदेच रिक्त असल्याने शासनाच्या मूळ उद्देशांना हरताळ फासला जात आहे. याच कारणांमुळे अनेक ग्रामपंचातींच्या मासिक सभाच होत नसल्यानेही विकासाला बहुतांशी ‘ब्रेक’ लागल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत