गणेश मंडळांचा सन्मान की अवमान?
By Admin | Updated: December 16, 2015 01:50 IST2015-12-16T01:50:43+5:302015-12-16T01:50:43+5:30
जुन्या सन्मानचिन्हावरून पेटले रण: काहींनी केले सन्मानचिन्ह परत.

गणेश मंडळांचा सन्मान की अवमान?
धनंजय कपाले / वाशिम: शहरातील प्रत्येक गणेश मंडळातील सदस्यांना सामाजिक उपक्रमाच्या प्रवावाहामध्ये आणण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातील गणेश मंडळांना सन्मानित करण्यात आले; परंतु पुरस्कार वाटपाच्या कार्यक्रमात चक्क २0१२ चे सन्मानचिन्ह वाटण्यात आल्याने गणेश मंडळांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे काही गणेश मंडळांनी सन्मानचिन्ह परत केले.
पोलीस प्रशासनाच्या वतीने सन २0१५ मध्ये स्थापन केलेल्या गणेश मंडळाला सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले होते. सामाजिक कार्यक्रमामध्ये उल्लेखनीय कार्य करणार्या गणेश मंडळाला सन्मानचिन्ह व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा पोलीस प्रशासनाने गणेश उत्सवाच्या पूर्वीच केली होती.
या अनुषंगाने वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या वतीने १४ डिसेंबरला शहरातील गणेश मंडळाला निमंत्रित केले होते. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून वसंतराव धाडवे यांनाही निमंत्रित केले होते; परंतु धाडवे यांनी मंगरूळपीर व शेलूबाजार येथील गणेश मंडळांना निमंत्रित केले. धाडवे यांच्या या प्रकारामुळे पोलीस अधिकारी व कर्मचार्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटला. सामाजिक उपक्रमामध्ये अग्रेसर ठरलेल्या गणेश मंडळापैकी छावा गणेश मंडळाला द्वितीय पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी त्यांना सन २0१२ चे सन्मानचिन्ह (कार्यक्रमाला उपस्थित नसलेल्या ह्यनामदार वर्षाताई गायकवाडह्ण यांच्या हस्ते असे लिहिलेले) देऊन गौरविण्यात आले. जुने सन्मानचिन्ह दिल्यामुळे छावा संघटनेच्या यामध्ये भावना दुखावल्या गेल्या. याशिवाय, मंत्री पार्क गणेश उत्सव मंडळाला सामाजिक उपक्रमामध्ये प्रथम पारितोषिक मिळालेले असताना त्यांना चक्क तृतीय पारितोषिक लिहिलेले स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.