शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
3
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
4
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
5
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
6
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
7
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
8
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
9
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
10
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
11
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
12
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
13
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
14
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
15
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
16
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
17
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
18
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
19
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
20
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?

रिसोडच्या वन उद्यानात पाण्याअभावी झाडे सुकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 4:15 PM

लाखो रुपये खर्च करून रिसोड शहराजवळ वनविभागातर्फे वन उद्यान साकारण्यात आले. सद्यस्थितीत वन उद्यान भकास दिसत असून, पाण्याअभावी झाडे सुकून गेली आहेत.

ठळक मुद्देवन उद्यान भकास दिसत असून, पाण्याअभावी झाडे सुकून गेली तर सौर ऊर्जेवर चालणारे जवळपास २०० लाईट बंदस्थितीत आहेत. वन उद्यानात सुविधांचा अभाव असल्याचा फटका नागरिकांना बसत आहे. उद्यानात सौर उर्जेवर चालणारे २१० लाईट बसविण्यात आले आहे. यातील सर्वच लाईट बंद आहेत.

शीतल धांडे 

रिसोड - लाखो रुपये खर्च करून रिसोड शहराजवळ वनविभागातर्फे वन उद्यान साकारण्यात आले. सद्यस्थितीत वन उद्यान भकास दिसत असून, पाण्याअभावी झाडे सुकून गेली तर सौर ऊर्जेवर चालणारे जवळपास २०० लाईट बंदस्थितीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. रिसोड शहरात एकही उद्यान नसल्याने साधारणत: तीन वर्षांपूर्वी वनविभागातर्फे वन उद्यान साकारण्यात आले. यासाठी लाखो रुपयांचा  खर्च झाला. येथे बच्चे कंपनीसाठी खेळण्याचे विविध साहित्य आहे.  सोमवारी (२२ एप्रिल) येथील वन उद्यानाची पाहणी केली असता, वन उद्यानाच्या मूळ उद्देशाला तडा जात असल्याचे चित्र समोर आले. योग्य देखभाल नसल्याने वन उद्यान भकास झाले आहे. पाणी नसल्याने उद्यानातील झाडे सुकून गेल्याचे दिसून येते. सकाळ व सायंकाळच्या सुमारास या उद्यानात फिरण्यासाठी काही नागरिक, महिला येतात. उद्यान भकास दिसत असल्याने उद्यानात येणाऱ्यांची संख्याही कमी झाल्याचे दिसून येते. 

वन उद्यानात सुविधांचा अभाव असल्याचा फटका नागरिकांना बसत आहे. उद्यानात पिण्यासाठी पाणीसुद्धा उपलब्ध नाही. उद्यानात सौर उर्जेवर चालणारे २१० लाईट बसविण्यात आले आहे. यातील सर्वच लाईट बंद आहेत. बहुतांश लाईटची बॅटरी सुध्दा चोरीला गेल्याचे दिसून आले. मुख्य प्रवेशद्वारासमोरील लाईट कधी बंद तर कधी कधी सुरु असतो. सौर ऊर्जेवर चालणारा पाण्याचा पंप सुद्धा बंद अवस्थेत आहे. महाशिवरात्रीपासुन येथील वन परीक्षेत्र अधिकारी वानखेडे  हे रजेवर असल्याची माहिती उपस्थित कर्मचाऱ्यांनी दिली. उद्यानातील मुलांचे खेळाचे साहित्य मोडकळीस आले आहे. यामध्ये चार पाळणे व छत्र्या सुद्धा तुटलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. घसरगुंडी सुद्धा तुटली आहे. तीन बोअर असुन सुद्धा उद्यानातील बरीच झाडे पाण्याअभावी सुकली आहेत. 

वन उद्यानात लहान मुलांसाठी खेळण्याकरीता मोठया प्रमाणात नविन साहित्य आलेले आहे. परंतु देखभालअभावी ते सुध्दा कित्येक दिवसांपासबन धुळ खात पडले आहे. उद्यानात रोपवाटिका असुन खैरी, साग, सिताफळ, चिंच, गुलमोहर, कविट, चिल्लारी रोप, लिंब, कांचन, बांबु आदी रोपे आहेत. पाणीटंचाईमुळे रोपवाटिका जगविण्याचे आव्हान वन विभागासमोर उभे ठाकले आहे. 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी