शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे यंदा उद्भवणार चाराटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 15:28 IST

रब्बी ज्वारीच्या पेरणीवर भर देण्याची गरज असल्याचे मत कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले असून, या पिकातून गुरांसाठी मिळणारे कुटारही नष्ट झाले आहे. त्यात खरीप हंगामात ज्वारीची पेरणी कमी होते. त्यामुळे पुढील काळात चाऱ्याची समस्या गंभीर होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी यंदाच्या रब्बी हंगामात चारापिकांवर प्रामुख्याने रब्बी ज्वारीच्या पेरणीवर भर देण्याची गरज असल्याचे मत कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून खरीप ज्वारीसह इतर तृणधान्याच्या क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. प्रामुख्याने ज्वारी, बाजरीचे क्षेत्र आता नावापुरतेच राहिले आहे. त्यातच कपाशीचे क्षेत्रही घटल्याने गुरांच्या चाºयाचा प्रश्न सतत पशूपालकांना भेडसावत आहे. जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहिेले असले तरी, शेतकरी ज्वारीच्या पेºयावर भर देण्याची शक्यता कमीच आहे. वन्यप्राण्यांचा त्रास बाजारात अपेक्षेच्या तुलनेत मिळणारे कमी दर आणि वाढता खर्च यामुळे शेतकरी ज्वारीसह इतर चारा पिकांकडे पाठ करीत आहेत.ज्वारी, बाजरीचा पेरा घटल्याने कडबा मिळणे कठीण आहे. तर कपाशीचा पेरा घटल्याने सरकी, सरकी ढेपेचे दर गगनाला भिडले आहेत. अशात गुरांच्या चाºयासाठी सोयाबीनच्या कुटाराचा मुख्य आधार पशूपालक आणि शेतकरीवर्गाला मिळाला होता. जिल्ह्यात हिवाळ्याच्या मध्यंतरापासून हिरवा चारा नष्ट झाल्यानंतर या कुटारावरच गुरांचे भरणपोषण करण्यावर भर दिला जातो. आता यंदा अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. त्यात प्रामुख्याने सोयाबीनच्या शेंगा आणि झाडे पावसाने कुजल्याने कुटार उपलब्ध होण्याची शक्यताच मावळली आहे. त्यात ज्वारीच्या पिकाचा पेरा नावापुरताच असून, इतर चारापिकेही शेतकºयांना घेता आली नाहीत. त्यामुळे यंदा हिवाळा अखेरपासून जिल्ह्यात पशूंच्या चाºयाचा प्रश्न गंभीर रुप धारण करणार आहे. या समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळवायचे असेल, तर शेतकºयांना यंदाच्या हंगामात रब्बी ज्वारीसह इतर चारा पिकांवर भर देणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, कृषी विभागानेही यंदा सरासरी क्षेत्राच्या तुलनेत रब्बी ज्वारीच्या पेरणीचे नियोजन वाढविले असून, गळीत धान्याचा पेरा वाढविण्यावरही कृषी विभागाकडून भर देण्यात येणार आहे. कृषी विभागाच्या या प्रयत्नांना शेतकºयांचा प्रतिसाद लाभला किंवा चाराटंचाईची तिव्रता लक्षात आली, तरच जिल्ह्यातील संभाव्य चाराटंचाईवर नियंत्रण मिळविणे शक्य होईल, असे मत कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनीही व्यक्त केले आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी