शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

अखेर चाकातिर्थ-कुरळा जलवाहिनीचा मुहुर्त निघाला; मालेगावकरांची पाणीटंचाई मिटण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 3:55 PM

मालेगाव: शहरातील पाणी टंचाई  दूर करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या काटेपूर्णा ते कुरळा या जलवाहिनीच्या कामाला अखेर ८ मार्चपासून सुरुवात झाली. 

ठळक मुद्देचाकातिर्थ प्रकल्पातील पाणीसुद्धा आरक्षित असल्याने आणि प्रशासकीय मान्यता नसल्याने मालेगावकरांना त्याचा फायदा होऊ शकत नव्हता. या प्रकल्पातून कुरळाधरणापर्यंत पाणी आणण्यासाठी मालेगाव नगर पंचायतने प्रस्ताव तयार करून तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे मंजुरीसाठी पाठविला होता. अखेर सर्व प्रशासकीय कार्यवाही पार पडल्यानंतर ८ मार्च रोजी या योजनेच्या कामाचे भूमीपुजन करण्यात आले.

मालेगाव: शहरातील पाणी टंचाई  दूर करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या काटेपूर्णा ते कुरळा या जलवाहिनीच्या कामाला अखेर ८ मार्चपासून सुरुवात झाली.  तब्बल १ कोटी ३४ लाख रुपये खर्च असलेल्या या योजनेमुळे मालेगावकरांची पाणीटंचाईची समस्या मिटण्याची चिन्हे दिसत आहेत.  

मालेगाव शहरालगतच काही अंतरावर कोल्ही, केळी आणि चाकातिर्र्थ हे लहान मोठे प्रकल्प आहेत. तथापि, चाकातिर्थ वगळता उन्हाळ्याच्या दिवसांत इतर प्रकल्प तळ गाठतात; परंतु चाकातिर्थ प्रकल्पातील पाणीसुद्धा आरक्षित असल्याने आणि प्रशासकीय मान्यता नसल्याने मालेगावकरांना त्याचा फायदा होऊ शकत नव्हता. ही बाब लक्षात घेऊन या प्रकल्पातून कुरळाधरणापर्यंत पाणी आणण्यासाठी मालेगाव नगर पंचायतने प्रस्ताव तयार करून तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे मंजुरीसाठी पाठविला होता. मंत्रालय स्तरावर त्या प्रस्तावाला १२ फेब्रुवारी रोजी मान्यता मिळाली आणि या योजनेच्या कामासाठी १ कोटी ३४ लाख रुपये मंजूर करण्यात आले. मालेगाव शहरात असलेली तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता या योजनेचे काम युद्धपातळीवर होण्याची मागणी नागरिकांच्यावतीने करण्यात येत होती. अखेर सर्व प्रशासकीय कार्यवाही पार पडल्यानंतर ८ मार्च रोजी या योजनेच्या कामाचे भूमीपुजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा मिनाक्षी सावंत, बबनराव चोपडे, तहसीलदार राजेश वजिरे, मुख्याधिकारी गणेश पांडे, नगर पंचायतचे पाणी पुरवठा सभापती रामदास बळी, गजानन सारस्कर, रेखा अरुण बळी, अफसाना तस्लिम, अमोल सोनोने, उमेश खुळे, शशिकांत टनमने, तस्लिम सय्यद, किशोर महाकाळ, संतोष सुरडकर, संतोष जोशी, चंदू जाधव, डॉ. निलेश मानधने, संतोष बनसोड, प्रमोद हरने, मनोज सरदार आदि सर्व नगरपंचायत सदस्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 

 

चाकातीर्थ ते कुरळा तातडीच्या पाणीपुरवठा योजनेला शासनाची मंजुरात मिळाली असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आज काम सुरु करण्यात आले आहे. १५ ते २० दिवसांत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. 

-गणेश पांडे, मुख्याधिकारी, नगर पंचायत, मालेगाव 

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव