अखेर दहा दिवसांनंतर विद्युत पुरवठा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:31 IST2021-05-30T04:31:40+5:302021-05-30T04:31:40+5:30
काजळेश्वर उपाध्ये : गत दहा दिवसांपासून ग्रामपंचायत भवन येथील रोहित्रावरून विद्युत पुरवठा खंडित हाेत असल्याने आदिवासी वसाहत व तांडा ...

अखेर दहा दिवसांनंतर विद्युत पुरवठा सुरळीत
काजळेश्वर उपाध्ये : गत दहा दिवसांपासून ग्रामपंचायत भवन येथील रोहित्रावरून विद्युत पुरवठा खंडित हाेत असल्याने आदिवासी वसाहत व
तांडा वसाहतीतील ग्रामस्थ त्रस्त होते. यासंदर्भात ‘लाेकमत’ने वृत्त प्रकाशित करताच कारंजा महावितरणचे मुख्य अभियंता, सर्कल अभियंता यांनी तातडीने दखल घेऊन काजळेश्वर येथील रोहित्र बदलून दिले व विद्युत पुरवठा सुरळीत केला. दहा दिवसांनंतर विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने ग्रामस्थांतून आनंद व्यक्त केला जात आहे.
येथील तांडा वस्ती व आदिवासी वस्ती येथे ग्रामपंचायत भवन डीपीवरून विद्युत पुरवठा होतो. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे विद्युत पुरवठा अनियमित हाेता. दहा दिवसांपासून खंडित विद्युत पुरवठ्यामुळे ग्रामस्थ
त्रस्त होते. विद्युत पुरवठा नियमित करावा, अशी मागणी प्रहार जनशक्तीचे सेवक प्रदीप उपाध्ये, महादेव जाधव, अनिल महाराज राठोड, उमेश बढे, हसनभाई आदींनी महावितरणकडे केली होती. याबाबत ‘लाेकमत’ने वृत्त प्रकाशित करताच महावितरणचे मुख्य अभियंता बोळे यांनी सर्कल अभियंत्यांच्या मार्गदर्शनात महावितरणचे कर्मचारी हितेश सोईतकर, सतीश ढाकूलकर, विलास सावरकर, प्रल्हाद तिडके यांनी विद्युत रोहित्र बदलून विद्युत पुरवठा सुरळीत केला.