शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

भंगारातील साहित्य घेऊन बनविले खत पेरणी यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 13:30 IST

मजुरांचा तुटवडा आणि कामाला होणारा विलंब या समस्येवर मात करण्यासाठी इंझोरीचा युवा शेतकरी अजय ढोक याने चक्क खत पेरणी यंत्रच तयार केले आहे.

- नरेश आसावा लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी: पिकांना खत देण्यासाठी दिवसेंदिवस खर्चात होणारी वाढ, मजुरांचा तुटवडा आणि कामाला होणारा विलंब या तिन्ही समस्येवर मात करण्यासाठी इंझोरीचा युवा शेतकरी अजय ढोक याने चक्क खत पेरणी यंत्रच तयार केले आहे. विशेष म्हणजे यासाठी सदर शेतकऱ्याने भंगारातील टाकाऊ साहित्याचाच वापर केला आहे.इंझोरी येथील युवा शेतकरी अजय ढोक हे आपल्या वडिलोपार्जित शेतीत विविध पिके घेऊन आर्थिक विकास साधण्याची धडपड करीत आहेत. त्यांनी आपल्या शेतीत विविध प्रयोगही केले आहेत. कमी खर्चात आणि कमी वेळेत शेतीतील अधिकाधिक कामे कशी करता येतील, यासाठी ते सतत वेगवेगळे प्रयोग करतात. त्यातील काही प्रयोग यशस्वीही झाले आहेत. याच प्रयोगातून त्यांनी कमी वेळेत, कमी खर्चात आणि प्रभावीरित्या खताची पेरणी करावी म्हणून चक्क ट्रॅक्टरचलित खत पेरणी यंत्रच तयार केले आहे. यासाठी त्यांनी एक लोखंडी पेटी, दुंड्याची फ्रेम, मोठ्या पेरणी यंत्राचा गिअर आणि चेन व्हील सेट, असे विविध साहित्य भंगाराच्या दुकानातून खरेदी केले. हे सर्व साहित्य जोडून त्यांनी अवघ्या पाच हजार रुपयांत अतिशय उपयुक्त असे खत पेरणी यंत्र तयार केले. यासाठी त्यांना लक्ष्मणराव आखुळ यांचे सहकार्य लाभले. खत पेरणी यंत्राचे प्रात्यक्षिक त्यांनी स्वत:च्या शेतात केले आणि ते प्रभावी असल्याचे सिद्ध झाले. या पेरणी यंत्राच्या आधारे कपाशी, तूर, मुग, उडिद, सोयाबीन, पपई, कारले, दोडका आदि विविध पिकांत खत पेरणीही त्यांनी यशस्वीपणे करून दाखविली. इंझोरी येथील शेतकरी अजय ढोक यांनी वेगवेगळे प्रयोग करून कमी खर्चात भरघोस पिक घेण्याची कामगिरीही साधली आहे. कपाशी, तूर, सोयाबीन, मुंग, उडिद या खरीप पिकांसह भाजीपाला पिकांचेही ते अधूनमधून उत्पादन घेतात. यापुढे शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन तणाचा समुळ नायनाट करणे, फवारणीचे काम सोपे करण्यासाठीही यंत्र विकसीत करता येईल का, याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

इतरही शेतकºयांकडून वापरइंझोरी येथील प्रयोगशील शेतकरी अजय ढोक यांनी खत पेरणीसाठी तयार केलेले यंत्र स्वत:च्या शेतात खतपेरणीसाठी वापरले असून, याचा फायदा होत असल्याने इतरही शेतकरी त्यांच्याकडून या यंत्राचा वापर करीत आहेत. गावातील अनेक शेतकºयांनी या यंत्राच्या आधारे शेतातील आंतर पिकात खत टाकून घेतले आहे. त्यामुळे त्यांचा खर्च आणि वेळ वाचलाच आहे शिवाय मजुरांच्या तुटवड्याचा त्रासही टळला असून, पिके योग्य प्रमाणात मिळालेल्या खतामुळे जोमदार झाली आहेत. प्रामुख्याने कपाशीच्या पिकात याचा वापर होत आहे.

एकरी सहाशे रुपयांसह वेळेची बचतया यंत्रामुळे शेतकºयांना पिकांना खत देण्यासाठी येणाºया खर्चात एकरी ६०० रुपयांची बचत होतेच शिवाय कमी वेळेत प्रभावी पद्धतीने खत पिकांना देणे शक्य होत असल्याने पिकांना त्याचा मोठा फायदा होऊन पिके जोमदारही होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याशिवाय आंतरमशागतीच्या खर्चातही ६०० रुपयांची बचत या यंत्रामुळे होत आहे. त्यांचा हा प्रयोग इतर शेतकºयांसाठी आदर्श ठरावा असाच आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी