शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:17 IST2021-03-04T05:17:42+5:302021-03-04T05:17:42+5:30

वाशिम : कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या सेंद्रिय व जैविक शेती गटातील ६२ शेतकऱ्यांची ह्यविकेल ते ...

To farmers for sale of farm produce | शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांना

शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांना

वाशिम : कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या सेंद्रिय व जैविक शेती गटातील ६२ शेतकऱ्यांची ह्यविकेल ते पिकेल अभियानह्णसाठी निवड करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांचे शेतमाल विकताना उन्हापासून संरक्षण होण्यासाठी त्यांना छत्रीचे वितरण करण्यात येणार असून बाभूळगाव येथील शेतकरी भागवत श्रीराम ढोबळे यांना ह्यआत्माह्णचे उपसंचालक एन. आर. ठोंबरे यांच्या हस्ते मंगळवारी छत्रीचे वितरण करून याचा शुभारंभ करण्यात आला.

ह्यआत्माह्ण अंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानाची अंमलबजावणी सुरु आहे. यामध्ये परंपरागत कृषि योजना (सेंद्रिय शेती) व डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ७३ जैविक व सेंद्रिय गट स्थापित आहेत. या गटांमधील जे शेतकरी तालुकास्तरावर अथवा गावामध्ये रस्त्याच्या शेजारी उन्हामध्ये बसून सेंद्रिय शेतमाल विक्री करीत असतात, अशा जिल्ह्यातील ६२ शेतकऱ्यांची ‘विकेल ते पिकेल’ अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतमाल विक्री करताना त्यांचा उन्हापासून बचाव व्हावा, यासाठी त्यांना छत्रीचे वितरण करण्यात येणार आहे.

थेट शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून शेतमाल विक्री करणे, तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा योग्य मोबदला मिळावा व त्यांच्या आर्थिक मिळकतीत वाढ होवून ग्राहकांना सुद्धा चांगल शेतमाल मिळणे शक्य व्हावे, यासाठी ’विकेल ते पिकेल अभियान’ हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

Web Title: To farmers for sale of farm produce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.