शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

रब्बी पीक विम्यापासून शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 12:14 PM

शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी असलेली ३१ डिसेंबरची मुदत अंतिम संपली  तरी याबाबत निर्णय घेण्यात आला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाच्या पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात रब्बी पीक विम्याची जबाबदारी घेण्यास एकाही कंपनीने निविदा भरल्या नसताना शासनानेही जिल्ह्यात ही योजना राबविण्याची जबाबदारी भारतीय कृषी पीक विमा कंपनीकडे दिली नाही. त्यात शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी असलेली ३१ डिसेंबरची मुदत अंतिम संपली  तरी याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील शेतकरी रब्बी हंगामात पीक विमा योजनेपासून वंचित राहणार आहेत.राज्यात खरीप हंगाम २०१६ पासून पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ही योजना रब्बी हंगाम २०१९-२० मध्ये राबविण्यास शासनाने २८ नोव्हेंबरच्या शासन निर्णयान्वये मंजुरीही दिली आहे. यानुसार राज्यातील सर्व ३४ जिल्ह्यात अधिसूचित पिकांसाठी ही योजना राबविणे आवश्यक असल्याने यासाठी विमा कंपन्यांडून निविदा मागविण्यात आल्या. तथापि, राज्यातील ३४ जिल्ह्यांपैकी वाशिमसह १० जिल्ह्यांसाठी एकाही विमा कंपनीने निविदा भरली नाही. अर्थात या १४ जिल्ह्यातील पीक विम्याची जोखीम पत्करण्यास कोण तीही कंपनी तयार झालेली नाही. त्यामुळे राज्य शासनाने या संदर्भात पुढाकार घेऊन शासनाच्या कृषी पीकविमा कंपनीकडे ही जबाबदारी सोपविण्यासाठी पाठपुरावा केला नाही. परिणामी, वाशिम जिल्ह्यातील शेतकरी रब्बी हंगामातील पीकविम्याच्या संरक्षणापासून वंचित राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यात शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात निवेदन सादर करून रब्बी पीकविमा योजना राबविण्याची मागणी करीत आहेत. वाशिमसह १० राज्यातील जिल्ह्यात कोणत्याही कंपनीने रब्बी पीकविम्याच्या जबाबदारीसाठी निविदा भरलेल्या नाहीत. या संदर्भात शासनस्तरावर निर्णय होणे अपेक्षीत होते. तथापि, अद्याप शासनाच्या कृषीविमा कंपनीकडे ही जबाबदारी सोपविण्यात आलेली नाही. आम्हालाही या संदर्भात कुठल्या सुचना देण्यात आल्या नसून, जिल्हास्तरावर या संदर्भातील कोणताच निर्णय घेतला जाऊ शकत नाही. शासनस्तरावरूनच या संदर्भात निर्णय घेतला जातो.-एस. एम. तोटावारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमCrop Insuranceपीक विमा