शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

कर्जमुक्तीपासून भर येथील शेतकरी वंचित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 5:29 PM

परिणामी, खरिप हंगामात नवीन पीककर्ज मिळणेही अशक्य झाले आ

लोकमत न्यूज नेटवर्कभर जहॉगीर (वाशिम) : भर जहॉगीर परिसरातील अनेक शेतकरी महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचित राहिले आहेत. आधार प्रमाणिकरण अपूर्ण असल्याने थकित कर्ज दिसत आहे. परिणामी, खरिप हंगामात नवीन पीककर्ज मिळणेही अशक्य झाले आहे.शेतकºयांची आर्थिक परिस्थिती विचारात घेता महाआघाडी सरकारने दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ केले आहे. भर जहॉगीर परिसरातील अनेक शेतकºयांचे पीककर्जाचे पुनर्गठण परस्पर केल्याने तसेच त्यानंतर कर्ज हप्ते न भरल्याने या शेतकºयांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळू शकला नाही. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य उषा गरकळ, भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल गरकळ यांनी मध्यंतरी आंदोलनही केले होते. त्यानंतर देशभरात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झाल्याने सर्व प्रक्रिया ठप्प झाली. २४ मार्चपासून लॉकडाउन व संचारबंदी असल्याने आधार प्रमाणिकरणही बंद झाले. परिसरातील अनेक शेतकरी पात्र असूनही कर्जमुक्ती योजनेपासून वंचित राहिले. कर्ज थकित दाखवित असल्याने कर्जमुक्तीचा सर्व खाते अडचणीत आले आहेत. खरिप हंगामाचा कालावघी जवळ येत असल्याने बियाणे, खते खरेदीसाठी शेतकºयांना पैशाची गरज भासत आहे. परंतू, कर्जमुक्तीचा लाभ नसल्याने नवीन कर्जही मिळणे कठीण झाले आहे. अगोदरच विविध कारणांमुळे शेतकरी संकटात सापडत आहेत. त्यात आता कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नसल्याने शेतकºयांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणेच जिल्हा मध्यवर्ती बँके्नचे अनेक शेतकºयांचे कर्ज थकित दाखवित आहे. शेतकºयांना दिलासा म्हणून कर्जमुक्तीचा लाभ द्यावा तसेच नवीन कर्ज तातडीने मंजूर करावे, अशी मागणी अल्पभूधारक शेतकरी गंगाधर काष्टे यांनी केली.

टॅग्स :washimवाशिमCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी