शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

मुग, उडिदाच्या बियाण्यांकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 2:52 PM

वाशिम: यंदा मान्सून लांबणीवर पडल्याने मुग आणि उडिद या पिकांच्या पेरणीची वेळ जवळपास निघून गेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदा मान्सून लांबणीवर पडल्याने मुग आणि उडिद या पिकांच्या पेरणीची वेळ जवळपास निघून गेली आहे. आता या पिकांची पेरणी अंगलट येण्याची भिती असल्याने शेतकरी या पिकांच्या बियाण्यांकडे पाठ करीत असल्याचे चित्र पश्चिम वºहाडात पाहायला मिळत आहे. त्यामुळे कमी धोक्याचे पीक असलेल्या सोयाबीनच्या क्षेत्रात यंदा अधिकच वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दरवर्षीच्या तुलनेत यंदा रत्तज्यात मान्सूनला मोठा विलंब झाला. त्यामुळेच जुन महिन्याच्या शेवटचा आठवडा सुरू झाला तरी, खरीपाच्या पेरणीला सुरुवात झाली नाही. प्रत्यक्षात मान्सूनपूर्व पावसानंतरच खरीपाची पेरणी अनेक शेतकरी करतात; परंतु यंदा मान्सूनपूर्व पावसाचे प्रमाणही नगण्य राहिले. त्यामुळे जमिनीत ओलावाही निर्माण झाला नाही. आता खरिपातील कमी कालावधीचे पीक असलेल्या मुग आणि उडिदाच्या पेरणीची वेळ निघून जात आहे. शनिवारी राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला तरी, त्यामुळे जमिनीची धूप भरून निघणार नसून, पेरणीला त्यामुळे विलंब होणार आहे. त्यातच पश्चिम वºहाडात कोरडवाहू क्षेत्र अधिक असून, जमिनीचा स्तरही फारसा सुपिक नाही. त्यामुळे मुग आणि उडिदाची पेरणी करणे शेतकऱ्यांसाठी जोखमीचे ठरणार आहे. पेरणीनंतर पावसाने खंड दिल्यास पेरणी उलटेलच शिवाय दुबार पेरणीची संधीही राहणार नाही. त्यामुळे शेतकरी या पिकाच्या बियाण्यांची खरेदी करीत नसल्याचे चित्र दिसत आहे. या पिकांच्या तुलनेत कमी पावसातही तग धरणाºया सोयाबीन बियाण्यांच्या खरेदीवर शेतकºयांनी जोर दिला आहे. त्यात महाबीजने यंदा काही नवे वाण उपलब्ध केले आहे. या वाणांची खरेदी शेतकरी मोठ्या प्रमाणात करीत असल्याची माहिती कृषी सेवा केंद्रांकडून प्राप्त झाली आहे. यावरून यंदा मुग आणि उडिदाचे क्षेत्र कमी होऊ सोयाबीनचे क्षेत्र पूर्वीपेक्षाही अधिक वाढण्याची शक्यता आहे.

पाऊस लांबल्याने मुग आणि उडिदाची पेरणी खोळंबली आहे. त्यामुळे बियाणे खरेदीची घाई आम्ही केली नाही. मुगाची पेरणी जोखमीची ठरणार आहे; परंतु येत्या दोन चार दिवसांत दमदार पाऊस पडला, तर उडिदाची पेरणी करणे शक्य होईल.- अनिल राठोडशेतकरी इंझोरी (वाशिम)

यापूर्वीही कधीही मान्सूनला एवढा लिवंब झाला नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबलेल्या आहेत. मुग आणि उडिदाची पेरणी लवकर होणे अपेक्षीत असते. कमी कालावधीची ही पिके शेतकºयांना आधार देणारी ठरतात. आता वेळ निघून जात असल्याने या पिकांची पेरणी करावी की नाही, हा प्रश्न पडला आहे.-दशरथ पवारशेतकरी, मंगरुळपीर (वाशिम)

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी