शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
3
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
4
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
5
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
6
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
7
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
8
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
9
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
10
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
11
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
12
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
13
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
14
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
15
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
16
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
17
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
18
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
19
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
20
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टी झाली, तर २० गावांना धोका ; पावसात या ठिकाणी न गेलेलेच बरे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:42 IST

वाशिम : अतिवृष्टी झाली तर नदीकाठावरील २० पेक्षा अधिक गावांना पुराचा तडाखा बसू शकतो. काही गावात जाण्यासाठी नदीनाल्यावर जमीन ...

वाशिम : अतिवृष्टी झाली तर नदीकाठावरील २० पेक्षा अधिक गावांना पुराचा तडाखा बसू शकतो. काही गावात जाण्यासाठी नदीनाल्यावर जमीन समांतर पूल असल्याने नागरिकांना पाण्यातून मार्गक्रमण करीत गाव गाठावे लागते.

गत तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यात संततधार पाऊस झाला. मंगरूळपीर तालुक्यातील भोपळपेंड नदीला पूर आल्यानंतर जवळपास १४ गावांचा संपर्कही तुटला होता. राज्यात कोकणासह कोल्हापूर आदी शहरांमध्येही पावसाने कहर केला. जिल्ह्यात अतिवृष्टी झाली तर २० पेक्षा अधिक गावांना पुराचा तडाखा बसू शकतो. काही गाव परिसरातील नदी, नाल्यावर पूल नसल्याने गावकऱ्यांना पाण्यातूनच मार्गक्रमण करावे लागते. मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे, रिसोड तालुक्यातील खडकी सदार, जायखेडा, नेतन्सा, मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव, शेंदुरजना, चिंचोली, पिंपळगाव आदी गावातील नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. पुलाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी पांगरी नवघरे, खडकी सदार, जायखेडा, नेतन्सा आदी भागातील नागरिकांनी वारंवार केली. परंतु, याकडे संबंधित यंत्रणेने अद्याप लक्ष दिले नाही. त्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, अतिवृष्टी, संततधार पाऊस झाला तर बचाव म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्हास्तर व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केले. शोध व बचाव पथके सज्ज ठेवणे, पंचनामा पथके तयार ठेवणे, पोहणाऱ्या व्यक्तींची माहिती संकलित करणे, तात्पुरते निवारे निश्चित करणे, स्वयंसेवी संस्थेचा सहभाग घेणे याबाबत जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना निर्देश दिले आहेत.

००००००००

जिल्ह्यात पाणी साचणारी ठिकाणं

संततधार पाऊस झाला तर मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे, रिसोड तालुक्यातील खडकी सदार, मानोरा तालुक्यातील चाकूर-गव्हा, मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव, शेंदुरजना आदी गाव परिसरात पाणी साचते. नदी, नाल्यावर जमीन समांतर पूल असल्याने पूर जातो. त्यामुळे गावात प्रवेश करताना पांगरी नवघरे, खडकी सदार आदी गावातील नागरिकांना पाण्यातूनच मार्गक्रमण करावे लागते.

००००

पुलाची निर्मिती केल्यास गैरसोय टळेल

नदी, नाल्यावर उंच पुलाची निर्मिती झाल्यास पूर जरी आला तरी नागरिकांना पुलावरून जाणे सोयीचे ठरणारे आहे. त्यामुळे खडकी सदार, चाकूर- गव्हा, पांगरी नवघरे यासह अन्य गाव परिसरातील नदी, नाल्यावर पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी होत आहे.

००००

पाऊस नको नकोसा !

कोट

संततधार पाऊस आला की गावाजवळून जाणाऱ्या नदी-नाल्याला पूर जातो. पूल नसल्यामुळे गावाचा संपर्क तुटतो. पूर ओसरल्यानंतर पाण्यातूनच मार्गक्रमण करावे लागते. या ठिकाणी पुलाची उभारणी करणे आवश्यक आहे.

- गणेश पाटील सदार

खडकी सदार

००००

कोट

अतिवृष्टीमुळे गावाला पुराचा वेढा पडतो. गावात पावसाचे पाणी शिरत असल्याने भीतीचे वातावरण असते. त्यामुळे अतिवृष्टी, संततधार पाऊस नको, नकोसा वाटतो. प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अपेक्षित आहे.

- मधुकर सोळंके

चिंचोली

०००००००००००००

प्रशासनाचे तेच ते रडगाणे

जिल्ह्यातील पांगरी नवघरे, खडकी सदार, चिंचोली यासह अन्य गावकऱ्यांना पाण्यातून मार्गक्रमण करावे लागते. या ठिकाणी उंच पुलाची निर्मिती अद्याप झाली नाही. निधी नाही, प्रशासकीय सोपस्कार बाकी आदी कारणे सांगून गावकऱ्यांची बोळवण केली जात आहे.

००००००००