शेतकरी आत्महत्या अपात्रतेचे प्रमाण वाढले
By Admin | Updated: October 24, 2016 17:11 IST2016-10-24T17:11:55+5:302016-10-24T17:11:55+5:30
जिल्ह्यात २०१५च्या तुलनेत यंदा शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण घटले;परंतु आत्महत्या करणा-या शेतक-यांच्या आत्महत्या अपात्र होण्याचे प्रमाण मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाढल्याचेही दिसत आहे.

शेतकरी आत्महत्या अपात्रतेचे प्रमाण वाढले
>ऑनलाइन लोकमत / दादाराव गायकवाड
वाशिम, दि. 24 - जिल्ह्यात २०१५च्या तुलनेत यंदा शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण घटल्याचे शासकीय आकडेवारीतून दिसते; परंतु विविध संकटांना कंटाळून आत्महत्या करणा-या शेतक-यांच्या आत्महत्या अपात्र होण्याचे प्रमाण मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाढल्याचेही दिसत आहे.
शेतकरी आत्महत्या हा विषय नव्हे, तर ही एक अतिशय भीषण अशी समस्या असून, ती दिवसेंदिवस वाढतच आहे. के वळ राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशभरात ही समस्या उग्र झाली आहे. मागील १६ वर्षांच्या काळात आजवर एकट्या वाशिम जिल्ह्यात १ हजार ३१२ शेतक-यांनी विविध संकटांमुळे आत्महत्या केली. त्यापैकी केवळ ५०७ शेतक-यांच्या आत्महत्या शासकीय मदतीसाठी पात्र ठरल्यात, तर तब्बल ७९४ शेतक-यांच्या आत्महत्या अपात्र ठरल्या असून, सप्टेंबर २०१६ ते आजवरच्या ११ शेतकरी आत्महत्या चौकशीत आहेत. त्यावरून आत्महत्यांच्या अपात्रेचे प्रमाण हे ३८.६४ टक्के असल्याचे स्पष्ट होते. मागील दोन वर्षांचा विचार केला, तर गतवर्षी जिल्ह्यात १०८ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले, तर यंदा आजवर ६४ शेतक-यांनी आत्महत्या केल्यात. मागील वर्षात आॅक्टोबर महिन्यापर्यत ८५ शेतक-यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्या तुलनेत यंदा हे प्रमाण घटल्याचे म्हणता येत असले तरी, त्यामुळे ही समस्या क मी झाली, असे मुळीच म्हणता येणार नाही. गतवर्षी एकूण १०८ शेतकरी आत्महत्यांपैकी एकूण ६० आत्महत्या शासकीय मदतीसाठी पात्र ठरल्या, यंदा मात्र चालू महिन्यापर्यंतच्या ६४ आत्महत्यांपैकी केवळ ३४ पात्र ठरल्यात, तर १९ अपात्र ठरल्या असून, ११ चौकशीत आहेत. गतवर्षीच्या पात्रतेचे प्रमाण जवळपास ५६ टक्के, तर यावर्षीच्या पात्रतेचे प्रमाण के वळ ५३ टक्के आहे.