शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पात्र कामगारास मिळणार साहित्य खरेदीसाठी अर्थसहाय्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 18:46 IST

वाशिम : कुटुंबाऐवजी आता प्रत्येक कामगारास अर्थसहाय्य दिले जाणार असल्याचा अध्यादेश उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने ७ मार्च रोजी पारित केला.

ठळक मुद्देकुटुंबाऐवजी आता प्रत्येक कामगारास अर्थसहाय्य दिले जाणार असल्याचा अध्यादेश उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने पारित केला. सदर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याची मंडळाकडे सलग तीन वर्षे नोंदणी असणे आवश्यक असल्याचे अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे. व्यक्तीश: ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळण्याकरिता बांधकाम कामगारांच्या अनेक संघटनांनी पाठपुरावा केला होता.

वाशिम : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत तथा पात्र बांधकाम कामगारांच्या कुटूंबास पुर्वी आवश्यक अवजारे खरेदी करण्यासाठी ५ हजार रुपये अर्थसहाय्य दिले जायचे. त्यात सुधारणा करित कुटुंबाऐवजी आता प्रत्येक कामगारास अर्थसहाय्य दिले जाणार असल्याचा अध्यादेश उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने ७ मार्च रोजी पारित केला. यामुळे गोरगरिब तथा गरजू बांधकाम कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे पात्र बांधकाम कामगारांची नोंद झाल्यानंतर लगेच त्याला ५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया अवलंबावी. तसेच पुढील तीन वर्षानंतर त्यास सदर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याची मंडळाकडे सलग तीन वर्षे नोंदणी असणे आवश्यक असल्याचे अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, कुटुंबाऐवजी नोंदणीकृत तथा पात्र प्रत्येक बांधकाम कामगारास कुदळ, फावडे, थापी यासह इतर बांधकाम साहित्य खरेदी करण्यासाठी व्यक्तीश: ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळण्याकरिता बांधकाम कामगारांच्या अनेक संघटनांनी पाठपुरावा केला होता. त्यास यामुळे यश मिळाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.पुर्वी बांधकाम कामगारांच्या कुटुंबास ५ हजार रुपये अर्थसहाय्य दिले जायचे. यामुळे मात्र कुटुंबातील अनेकांना एकाचवेळी ते साहित्य वापरणे अशक्य व्हायचे. शासनाने यात केलेल्या बदलामुळे आता नोंदणीकृत प्रत्येक कामगारास साहित्य घेण्यासाठी अर्थसहाय्य केले जाणार असून कामगारांच्या दृष्टीने ही आनंदाची बाब आहे.- पी.आर. महल्ले, सरकारी कामगार अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना