शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

दुष्काळी सवलती लागू; परीक्षा शुल्क परत कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 15:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : रिसोड तालुक्यासह दोन महसूल मंडळात दुष्काळी सवलती लागू केल्या आहेत. मात्र, तत्पूर्वीच शालेय व ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रिसोड तालुक्यासह दोन महसूल मंडळात दुष्काळी सवलती लागू केल्या आहेत. मात्र, तत्पूर्वीच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काचा भरणा केलेला आहे. त्यामुळे परीक्षा शुल्काचा भरणा केलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क परत मिळणे अपेक्षीत आहे. याकडे संबंधित यंत्रणा लक्ष कधी देणार? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यापूर्वी ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गाव, तालुका व जिल्ह्यात दुष्काळी सवलती लागू केल्या जात होत्या. यावर्षी दुष्काळ व दुष्काळसदृश परिस्थिती जाहिर करण्याच्या निकषात बदल करण्यात आलेला आहे. पावसाची सरासरी, पीक उत्पादनातील घट, जमिनीची आर्द्रता, पावसाचा खंड आदी बाब दुष्काळ जाहिर करताना विचारात घेतल्या जातात. यावर्षी अनेक तालुक्यांमध्ये तसेच महसूल मंडळात जून ते सप्टेंबर या दरम्यान पावसाने सरासरी गाठली नाही. कमी पर्जन्यमान झाल्याने उत्पादनात घट आली. रिसोड तालुक्यासह मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे तसेच मानोरा तालुक्यातील उमरी महसूल मंडळात दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे दुष्काळी सवलती लागू झाल्या. मात्र, दुष्काळ जाहिर होण्यापूर्वीच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काचा भरणा केलेला आहे. त्यामुळे भरलेले परीक्षा शुल्क परत मिळणे आवश्यक आहे, अशा प्रतिक्रिया पालकांमधून उमटत आहेत. गतवर्षीदेखील दुष्काळ जाहिर झालेला होता. तेव्हाही परीक्षा शुल्काचा भरणा झाल्यानंतर दुष्काळी सवलतीची घोषणा करण्यात आली होती. गतवर्षीचे परीक्षा शुल्क अद्याप विद्यार्थ्यांना परत मिळालेले नाही. हा आकडा जवळपास १० लाखांच्या घरात जातो. आताही रिसोड तालुका तसेच जऊळका रेल्वे व उमरी महसूल मंडळातील विद्यार्थ्यांनील परीक्षा शुल्काचा भरणा केलेला आहे. त्यामुळे सदर शुल्क परत मिळावे, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

टॅग्स :washimवाशिमEducationशिक्षणdroughtदुष्काळ