शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दुष्काळी सवलती लागू; परीक्षा शुल्क परत कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 15:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : रिसोड तालुक्यासह दोन महसूल मंडळात दुष्काळी सवलती लागू केल्या आहेत. मात्र, तत्पूर्वीच शालेय व ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रिसोड तालुक्यासह दोन महसूल मंडळात दुष्काळी सवलती लागू केल्या आहेत. मात्र, तत्पूर्वीच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काचा भरणा केलेला आहे. त्यामुळे परीक्षा शुल्काचा भरणा केलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क परत मिळणे अपेक्षीत आहे. याकडे संबंधित यंत्रणा लक्ष कधी देणार? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यापूर्वी ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गाव, तालुका व जिल्ह्यात दुष्काळी सवलती लागू केल्या जात होत्या. यावर्षी दुष्काळ व दुष्काळसदृश परिस्थिती जाहिर करण्याच्या निकषात बदल करण्यात आलेला आहे. पावसाची सरासरी, पीक उत्पादनातील घट, जमिनीची आर्द्रता, पावसाचा खंड आदी बाब दुष्काळ जाहिर करताना विचारात घेतल्या जातात. यावर्षी अनेक तालुक्यांमध्ये तसेच महसूल मंडळात जून ते सप्टेंबर या दरम्यान पावसाने सरासरी गाठली नाही. कमी पर्जन्यमान झाल्याने उत्पादनात घट आली. रिसोड तालुक्यासह मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे तसेच मानोरा तालुक्यातील उमरी महसूल मंडळात दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे दुष्काळी सवलती लागू झाल्या. मात्र, दुष्काळ जाहिर होण्यापूर्वीच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काचा भरणा केलेला आहे. त्यामुळे भरलेले परीक्षा शुल्क परत मिळणे आवश्यक आहे, अशा प्रतिक्रिया पालकांमधून उमटत आहेत. गतवर्षीदेखील दुष्काळ जाहिर झालेला होता. तेव्हाही परीक्षा शुल्काचा भरणा झाल्यानंतर दुष्काळी सवलतीची घोषणा करण्यात आली होती. गतवर्षीचे परीक्षा शुल्क अद्याप विद्यार्थ्यांना परत मिळालेले नाही. हा आकडा जवळपास १० लाखांच्या घरात जातो. आताही रिसोड तालुका तसेच जऊळका रेल्वे व उमरी महसूल मंडळातील विद्यार्थ्यांनील परीक्षा शुल्काचा भरणा केलेला आहे. त्यामुळे सदर शुल्क परत मिळावे, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

टॅग्स :washimवाशिमEducationशिक्षणdroughtदुष्काळ