शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

दुष्काळी सवलती लागू; परीक्षा शुल्क परत कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 15:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : रिसोड तालुक्यासह दोन महसूल मंडळात दुष्काळी सवलती लागू केल्या आहेत. मात्र, तत्पूर्वीच शालेय व ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रिसोड तालुक्यासह दोन महसूल मंडळात दुष्काळी सवलती लागू केल्या आहेत. मात्र, तत्पूर्वीच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काचा भरणा केलेला आहे. त्यामुळे परीक्षा शुल्काचा भरणा केलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क परत मिळणे अपेक्षीत आहे. याकडे संबंधित यंत्रणा लक्ष कधी देणार? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यापूर्वी ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गाव, तालुका व जिल्ह्यात दुष्काळी सवलती लागू केल्या जात होत्या. यावर्षी दुष्काळ व दुष्काळसदृश परिस्थिती जाहिर करण्याच्या निकषात बदल करण्यात आलेला आहे. पावसाची सरासरी, पीक उत्पादनातील घट, जमिनीची आर्द्रता, पावसाचा खंड आदी बाब दुष्काळ जाहिर करताना विचारात घेतल्या जातात. यावर्षी अनेक तालुक्यांमध्ये तसेच महसूल मंडळात जून ते सप्टेंबर या दरम्यान पावसाने सरासरी गाठली नाही. कमी पर्जन्यमान झाल्याने उत्पादनात घट आली. रिसोड तालुक्यासह मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे तसेच मानोरा तालुक्यातील उमरी महसूल मंडळात दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे दुष्काळी सवलती लागू झाल्या. मात्र, दुष्काळ जाहिर होण्यापूर्वीच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काचा भरणा केलेला आहे. त्यामुळे भरलेले परीक्षा शुल्क परत मिळणे आवश्यक आहे, अशा प्रतिक्रिया पालकांमधून उमटत आहेत. गतवर्षीदेखील दुष्काळ जाहिर झालेला होता. तेव्हाही परीक्षा शुल्काचा भरणा झाल्यानंतर दुष्काळी सवलतीची घोषणा करण्यात आली होती. गतवर्षीचे परीक्षा शुल्क अद्याप विद्यार्थ्यांना परत मिळालेले नाही. हा आकडा जवळपास १० लाखांच्या घरात जातो. आताही रिसोड तालुका तसेच जऊळका रेल्वे व उमरी महसूल मंडळातील विद्यार्थ्यांनील परीक्षा शुल्काचा भरणा केलेला आहे. त्यामुळे सदर शुल्क परत मिळावे, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

टॅग्स :washimवाशिमEducationशिक्षणdroughtदुष्काळ