शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

शेतीसाठी मजूर देता का मजूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:12 IST

जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन, तूर, उडीद, मूग आणि रबी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. गेल्या ...

जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन, तूर, उडीद, मूग आणि रबी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. गेल्या काही वर्षांत शेतीकामांमध्ये हार्वेस्टर, रोटाव्हेटर, ट्रॅक्टर यासारख्या यंत्राच्या साहाय्याने कामे केली जात आहेत; मात्र दगडधोंड्यांच्या कोरडवाहू शेतीत हार्वेस्टर किंवा रोटाव्हेटर पोहोचू शकत नाही किंवा तूर कापणीची कामे यंत्राच्या माध्यमातून केली जात नाहीत. अशावेळी मजुरांची नितांत गरज भासते; ४०० ते ५०० रुपये मोजूनही मजूर शेतीच्या कामावर यायला तयार नसल्याने शेतकऱ्यांची पंचाईत होत आहे.

.......................

काय म्हणतात शेतकरी

१) पाच वर्षांपूर्वी शेतीकामावरील मजुरीचे दर १०० ते १५० रुपये होते, ते आज ४०० ते ५०० वर पोहोचले आहेत. गेल्या वर्षीच तूर कापणीचे दर १२०० रुपये प्रति तिफन होते. यंदा मात्र ते ३ ते ४ हजारांवर गेले आहेत. इतके पैसे देण्यास तयार असूनही मजूर मात्र कामावर यायला तयार नसतात, असे खानापूर (ता. कारंजा) येथील शेतकरी राजेश पाटील कडू यांनी सांगितले.

............

२) भडशिवणीत अधिकांश शेती कोरडवाहू असून दगडधोंड्याच्या शेतात यंत्राच्या साहाय्याने कामे होत नाहीत. त्यामुळे मजुरांचीच मनधरणी करावी लागते; मात्र फारशी गरज उरली नसल्याने बक्कळ मजुरी देऊनही मजूर कामावर यायला तयार नसल्याचे भडशिवणी येथील शेतकरी राजे मनोहरराव लाहे यांनी सांगितले.

...........

३) गोरगरीब कुटुंबांना २ रुपये किलोने धान्य मिळत आहे. तांदूळही अत्यल्प दराने मिळतो. यासह शासनाच्या विविध स्वरूपातील योजना त्यांच्यासाठी लागू आहेत. त्यामुळेच शेतमजुरीची कामे करायला मजूरांमध्ये फारसा उत्साह राहिलेला नाही. कामे घेतल्यानंतर मधातच ती थांबविणारे अनेक मजूर आहेत. यामुळे मालाचे नुकसान होऊन मनस्ताप सहन करावा लागतो, असे शेतकरी रवि मारशेटवार यांनी सांगितले.

.................

मजुरीचा दर

पाच वर्षांपूर्वीचा दर

पुरुष मजूर - १५०

महिला मजूर - १००

.........

यंदाचा मजुरी दर

पुरुष मजूर - ५००

महिला मजूर - ३५०

............

यंत्राने होणारी कामे

नांगरणी, वखरणी, डवरणी यासह गहू कापणीची कामे यंत्राच्या साहाय्याने केली जातात; मात्र आजही शेतातील इतर अनेक कामे मजूरांच्याच माध्यमातून करावी लागतात.

..............

कृषी यंत्रांनी घेतली मजुरांची जागा

दिवसेंदिवस शेतीचा व्यवसाय धोकादायक ठरू लागला आहे. बक्कळ पैसे मोजूनही मजूर मिळेनासे झाले आहेत. यामुळे नुकसान होत आहे. ते टाळण्याकरिता बहुतांश शेतकऱ्यांनी शेत मशागतीच्या कामांसाठी यंत्राचा वापर सुरू केला आहे. ट्रॅक्टर, हार्वेस्टर, रोटाव्हेटर ही त्यातील काही यंत्र होत.