शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

शेतीसाठी मजूर देता का मजूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:12 IST

जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन, तूर, उडीद, मूग आणि रबी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. गेल्या ...

जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन, तूर, उडीद, मूग आणि रबी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. गेल्या काही वर्षांत शेतीकामांमध्ये हार्वेस्टर, रोटाव्हेटर, ट्रॅक्टर यासारख्या यंत्राच्या साहाय्याने कामे केली जात आहेत; मात्र दगडधोंड्यांच्या कोरडवाहू शेतीत हार्वेस्टर किंवा रोटाव्हेटर पोहोचू शकत नाही किंवा तूर कापणीची कामे यंत्राच्या माध्यमातून केली जात नाहीत. अशावेळी मजुरांची नितांत गरज भासते; ४०० ते ५०० रुपये मोजूनही मजूर शेतीच्या कामावर यायला तयार नसल्याने शेतकऱ्यांची पंचाईत होत आहे.

.......................

काय म्हणतात शेतकरी

१) पाच वर्षांपूर्वी शेतीकामावरील मजुरीचे दर १०० ते १५० रुपये होते, ते आज ४०० ते ५०० वर पोहोचले आहेत. गेल्या वर्षीच तूर कापणीचे दर १२०० रुपये प्रति तिफन होते. यंदा मात्र ते ३ ते ४ हजारांवर गेले आहेत. इतके पैसे देण्यास तयार असूनही मजूर मात्र कामावर यायला तयार नसतात, असे खानापूर (ता. कारंजा) येथील शेतकरी राजेश पाटील कडू यांनी सांगितले.

............

२) भडशिवणीत अधिकांश शेती कोरडवाहू असून दगडधोंड्याच्या शेतात यंत्राच्या साहाय्याने कामे होत नाहीत. त्यामुळे मजुरांचीच मनधरणी करावी लागते; मात्र फारशी गरज उरली नसल्याने बक्कळ मजुरी देऊनही मजूर कामावर यायला तयार नसल्याचे भडशिवणी येथील शेतकरी राजे मनोहरराव लाहे यांनी सांगितले.

...........

३) गोरगरीब कुटुंबांना २ रुपये किलोने धान्य मिळत आहे. तांदूळही अत्यल्प दराने मिळतो. यासह शासनाच्या विविध स्वरूपातील योजना त्यांच्यासाठी लागू आहेत. त्यामुळेच शेतमजुरीची कामे करायला मजूरांमध्ये फारसा उत्साह राहिलेला नाही. कामे घेतल्यानंतर मधातच ती थांबविणारे अनेक मजूर आहेत. यामुळे मालाचे नुकसान होऊन मनस्ताप सहन करावा लागतो, असे शेतकरी रवि मारशेटवार यांनी सांगितले.

.................

मजुरीचा दर

पाच वर्षांपूर्वीचा दर

पुरुष मजूर - १५०

महिला मजूर - १००

.........

यंदाचा मजुरी दर

पुरुष मजूर - ५००

महिला मजूर - ३५०

............

यंत्राने होणारी कामे

नांगरणी, वखरणी, डवरणी यासह गहू कापणीची कामे यंत्राच्या साहाय्याने केली जातात; मात्र आजही शेतातील इतर अनेक कामे मजूरांच्याच माध्यमातून करावी लागतात.

..............

कृषी यंत्रांनी घेतली मजुरांची जागा

दिवसेंदिवस शेतीचा व्यवसाय धोकादायक ठरू लागला आहे. बक्कळ पैसे मोजूनही मजूर मिळेनासे झाले आहेत. यामुळे नुकसान होत आहे. ते टाळण्याकरिता बहुतांश शेतकऱ्यांनी शेत मशागतीच्या कामांसाठी यंत्राचा वापर सुरू केला आहे. ट्रॅक्टर, हार्वेस्टर, रोटाव्हेटर ही त्यातील काही यंत्र होत.