शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

वाशिम जिल्ह्यातील धरणांच्या टक्केवारीत वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 2:39 PM

नदी-नाले दुथडी भरून वाहण्यासोबतच अनेक ठिकाणचे लघूसिंचन प्रकल्प तुडूंब झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात बुधवारी सर्वदूर जोरदार पाऊस कोसळला. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहायला लागले असून सिंचन प्रकल्पांच्या टक्केवारीतही विक्रमी वाढ झाली आहे. खरीप हंगामातील पिकांचे मात्र या पावसामुळे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये एकबुर्जी, सोनल व अडाण असे तीन मध्यम प्रकल्प असून १३१ लघूसिंचन प्रकल्प आहेत. दरम्यान, यंदा अर्धाअधिक पावसाळा उलटल्यानंतरही अपेक्षित पर्जन्यमान न झाल्याने सिंचन प्रकल्पांमध्येही पाणीसाठा झालेला नव्हता. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्यासोबतच आगामी रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी मिळण्याची आशाही धुसर झाल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. अशात गत काही दिवसांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस सुरू असून बुधवारी दिवसभर व रात्रीलाही जोरदार स्वरूपात पाऊस कोसळला. गुरूवारीही काहीवेळ चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहण्यासोबतच अनेक ठिकाणचे लघूसिंचन प्रकल्प तुडूंब झाले आहेत.जिल्ह्यातील तीनही मध्यम प्रकल्पांनी देखील ६० ते ६५ टक्क्यांची पातळी ओलांडली आहे. आगामी काही दिवस पावसाचे हे चित्र असेच कायम राहिल्यास संपूर्ण जिल्हा पाणीदार होण्यास वेळ लागणार नाही, असा सूर उमटत आहे.

टॅग्स :washimवाशिमDamधरण