शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात पीक नुकसानाचे पंचनामे अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 12:01 IST

Crop damage panchnama in Washim district Incomplete : १० दिवस उलटून गेले तरी, या नुकसानीचे पंचनामेच अद्याप पूर्ण झाले नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात १९ ते २१ मार्च आणि २२ ते २३ मार्चदरम्यान वादळी वारा, अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीने रबी पिकांसह, भाजीपाला आणि फळपिकांचे अतोनात नुकसान झाले. प्रशासनाने ६८८० हेक्टर क्षेत्राला नैसर्गिक आपत्तीचा फटका बसल्याचा प्राथमिक अहवालही शासनाकडे पाठविला; परंतु १० दिवस उलटून गेले तरी, या नुकसानीचे पंचनामेच अद्याप पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे पंचनामे पूर्ण होऊन शासनाकडे अंतिम अहवाल सादर होणार केव्हा आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.राज्यातील बहुतांश भागांत १९ ते २१ मार्च आणि २२ ते २३ मार्चदरम्यानच्या कालावधीत वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पाऊस पडला. लाखो हेक्टर क्षेत्रातील रबी पिकांसह भाजीपाला आणि फळपिकांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला. त्यात वाशिम जिल्ह्यात २७ महसूल मंडळातील १६९ गावांतील गहू, हरभरा या रबी पिकांसह भाजीपाला पिके, तसेच टरबूज, खरबूज, पपई, संत्रा, लिंबू आदी फळपिकांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला असून, तसा प्राथमिक अहवालही शासनाकडे पाठविला आहे. तथापि, १० दिवस उलटले तरी तालुकास्तरावरून जिल्हास्तरावर अंतिम अहवालच सादर करण्यात आला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष पंचनामे पूर्ण होऊन शासनाकडे अंतिम अहवाल सादर होणार केव्हा आणि शेतकऱ्यांना मदत मिळणार केव्हा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.   ३० टक्के पंचनामे प्रलंबित जिल्ह्यात ६८८० हेक्टर क्षेत्रातील रबी पिके, भाजीपाला पिके आणि फळपिकांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे; परंतु ३० मार्चपर्यंतही यापैकी केवळ ७० टक्के क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्ण केले असून, उर्वरित ३० टक्के क्षेत्रातील पंचनामेच झाले नसल्याने तालुकास्तरावरून अंतिम अहवालच प्राप्त होऊ शकला नाही.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी