शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

७७0 हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By admin | Updated: April 14, 2015 01:19 IST

रिसोडमध्ये सर्वाधिक नुकसान; कारंजा तालुक्यात १0९ घरांची पडझड.

वाशिम : ९ ते १२ एप्रिलदरम्यानच्या अवकाळी पाऊस व वादळ-वार्‍याने जिल्हय़ातील ७७0 हेक्टर क्षेत्रफळावरील पिकांना अवकाळी फटका दिल्याचा प्राथमिक अंदाज सर्वेक्षणातून समोर येत आहे. ९ ते १२ एप्रिलपर्यंत जिल्हय़ात वादळ-वारा आणि अवकाळी पावसाने ठाण मांडले होते. ऐन भरीस आलेला भाजीपाला, फळबागा उद्ध्वस्त होत असल्यामुळे शेतकर्‍यांच्या तोंडाला फेस आला. १२ एप्रिलला सायंकाळी ४ वाजेनंतर १३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्हय़ात सरासरी ११.८३ मिमी पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाच्या दप्तरी आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस रिसोड तालुक्यात ३२ मिमी झाला आहे. त्याखालोखाल कारंजा तालुक्यात १८.८0 मिमी, मालेगाव ७ मिमी, वाशिम व मानोरा प्रत्येकी ५ मिमी, तर मंगरुळपीर तालुका ३.२0 मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. रिसोड तालुक्यात २३२ हेक्टर, वाशिम तालुका १२५ हेक्टर, कारंजा व मानोरा प्रत्येकी ५0 हेक्टर, मालेगाव १00 हेक्टर, मंगरुळपीर २0८ असे एकूण ७७0 हेक्टरवरील रब्बी पीक, भाजीपाला, आंबा, फळबागेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कारंजा तालुक्यात अवकाळी पाऊस व वादळ वार्‍यामुळे १0९ घरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. म्हसला येथील ६३ व टाकळी येथील ४६ घरांची पडझड झाली आहे. तर काजळेश्‍वर, भांमदेवी परिसरातील कांदा व केळी पिकाचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार चेतन गिरासे यांनी दिली. मालेगाव तालुक्यात १२ एप्रिलपर्यंत अवकाळी पाऊस चांगला बरसला. यामध्ये ४ गावातील पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित गावचे पंचनामे सुरू आहेत. सर्व गावचे पंचनामे करून अंतिम अहवाल आल्यानंतर नुकसानाची निश्‍चित माहिती हाती येणार आहे. पंचनामे करताना कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, अशा सूचना कर्मचार्‍यांना दिल्याची माहिती नायब तहसीलदार डाबेराव यांनी दिली.