शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कपाशीची पेरणी १२ टक्क्यांनी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 16:18 IST

१७ जुलैपर्यंत २१ हजार ५२६ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली आहे

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात यंदा नियोजित क्षेत्राच्या तुलनेत कपाशीची पेरणी १२ टक्क्यांनी वाढली आहे. जिल्ह्यात १९ हजार २४५ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी अपेक्षीत असताना १७ जुलैपर्यंत २१ हजार ५२६ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली आहे. त्यात मानोरा तालुक्यात नियोजित क्षेत्राच्या तुलनेत पाच पटीने कपाशीचे क्षेत्र वाढले आहे, तर वाशिम तालुक्यातही शेतकºयांनी कपाशीकडे कल केल्याचे कपाशीच्या वाढलेल्या क्षेत्रावरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ४ लाख ६ हजार ४१ हेक्टरपेक्षा काही अधिक क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन आहे. जूनच्या पहिल्याच आठवड्यात शेतकºयांनी खरीप पेरणीला सुरुवात केल्याने १७ जुलैपर्यंत ३ लाख ७५ हजार ६७१ हेक्टर पेक्षा काही अधिक क्षेत्रात खरीप पिकांची पेरणी झाली आहे. त्यात कपाशीच्या क्षेत्रात यंदा लक्षणीय वाढ झाली आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार यंदा  १९ हजार २४५ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी अपेक्षीत होती. प्रत्यक्षात १७ जुलैपर्यंत जिल्ह्यात २१ हजार ५२६ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली आहे. त्यातही मानोरा तालुक्यात यंदा कपाशीचे क्षेत्र पाच पटीने वाढले आहे. या तालुक्यात कपाशीच्या पेरणीचे नियोजन केवळ १ हजार ८६८ हेक्टर क्षेत्रावर असताना प्रत्यक्षात ५ हजार ९ हजार ७४० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात कपाशीची पेरणी झाली आहे.  वाशिम तालुक्यातही कपाशीचे नियोजित क्षेत्र जवळपास २६१ हेक्टर असताना जवळपास ५४१ हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली आहे.   निकृष्ट सोयाबीन बियाण्याचा परिणामजिल्ह्यात यंदाच्या हंगामात निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे अनेक शेतकºयांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवले. ही पेरणी करताना बहुतांश शेतकºयांनी सोयाबीनकडे पाठ करून कपाशी, मुग, उडिद या पिकावर भर दिला. त्यामुळेच कपाशीच्या क्षेत्रात यंदा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. इतर चार तालुक्यात क्षेत्र कमीजिल्ह्यात कपाशीच्या पेºयात मंगरुळपीर तालुक्यात नियोजित क्षेत्राच्या तुलनेत ८७.५ टक्के, कारंजा तालुक्यात ६३.१५ टक्के, मालेगाव तालुक्यात ६१.७४ टक्के, तर रिसोड तालुक्यात १७.६९ टक्के क्षेत्रात कपाशीची पेरणी झाली आहे.  

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी