शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

कोरोना रुग्णांनी व्यायाम, आहारावर लक्ष द्यावे - डॉ.संतोष बोरसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 7:59 PM

Coronavirus in Washim तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष बोरसे यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असून, कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. कोरोना संसर्ग झाल्यानंतर रुग्णांनी कोणती पथ्ये पाळावी, कोरोनावर मात केल्यानंतर कोणता आहार घ्यावा, व्यायामावर भर कसा द्यावा, यासंदर्भात वैद्यकीय अधिकारी तथा मालेगावचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष बोरसे यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद. कोरोनातून बरे झाल्यानंतर आहार व व्यायामावर विशेष भर द्यावा, असा सल्ला डॉ. बोरसे यांनी दिला.

कोरोना विषाणू संसर्गापासून नागरिकांनी सतर्क कसे राहावे?कोरोनापासून बचाव म्हणून नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क किंवा रुमालचा वापर आणि हात वारंवार स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचे पालन करणे अत्यावश्यक आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रत्येकाने अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.

कोरोना संसर्गादरम्यान कोणती पथ्थे पाळावीत?कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर संबंधित रुग्णाने सर्वप्रथम न घाबरता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावे. वेळीच निदान व उपचार मिळाल्याने कोरोनातून बरे होणाºयाचे प्रमाण जास्त आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविणाºया अन्नपदार्थ्यांचा आहारात सर्वाधिक वापर करावा.

कोरोनातून बरे झाल्यावर पुढे कोणती दक्षता घ्यावी? कोरोनावर मात केल्यानंतर संबंधित रुग्णाने व्यायाम व सकस आहारावर भर द्यावा. हळदयुक्त दूध घ्यावे, भाजीपाला, फळांचा वापर आहारात करावा. नियमित व वेळेवर भोजन घ्यावे, एकाकीपण जाणवणार नाही तसेच मानसिक तणाव येणार नाही याची दक्षता घ्यावी. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी भोजनात सलादचा वापर करावा. सलादमध्ये टमाटर, बीट, मेथीचा वापर असावा. तत्पूर्वी ते कोमट पाण्यात लिंबू पिळून स्वच्छ करून घ्यावे. ग्रीन टिचे प्राशन करावे. त्यामध्ये अद्रक, दालचिनी, तुळशीची पाने, गवती चहा व गूळाचा समावेश करता येईल.

कोणती फळे सेवन करावी?क जीवनसत्व असणाºया फळांचे सेवन करणे अधिक उत्तम. संत्रा, मोसंबी आदी फळांचे सेवन आरोग्यदायी मानले जाते. तसेच बाहेरचे खाद्यपदार्थ टाळावे, उघड्यावर शिजविलेले खाद्यपदार्थ खाऊ नयेत. निरोगी शरीरासाठी आवश्यक असलेला हलका व्यायाम नियमित करावा. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नागरिकांनी सकस आहारावर सर्वाधिक भर दिला तर कोरोनापासून पुढील काळातही बचाव होऊ शकतो. कोरोनावर मात करून घरी परतल्यावर त्या रुग्णाकडे पाहण्याचा काहींचा दृष्टिकोन बदलतो. समाजाने कोरोना रुग्णांप्रती असलेला दृष्टिकोन बदलला पाहिजे. मनोधैर्य वाढेल, अशी वर्तणूक ठेवावी. कोरोनाच्या दुसºया लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे यापुढे अधिक सतर्क राहून प्रत्येकानेच स्वत:बरोबरच इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, गर्दीत जाणे टाळावे, मास्क किंवा रूमालचा नेहमी वापर करावा..

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखतcorona virusकोरोना वायरस बातम्या