शहरं
Join us  
Trending Stories
1
'गजा मारणेची पार्श्वभूमी माहीत नव्हती, आमची झालेली भेट केवळ अपघात'; निलेश लंकेंचे स्पष्टीकरण
2
अजित पवारांच्या विरोधातील मोहीम कुणाच्या इशाऱ्यावर? अण्णा हजारेंच्या भूमिकेवर NCPचा पलटवार
3
“शाहगड येथे कार्यालय सुरू करणार, आंदोलन सोडणार नाही”; मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार
4
सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे-फडणवीस का नव्हते? अजित दादांनी स्पष्टच सांगितले
5
“संजय राऊतांनी शिवसेनेचे दोन तुकडे करुन दाखवले, राज ठाकरेंवर बोलू नये”; मनसे नेत्यांचा पलटवार
6
RSSच्या मुखपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका; अजित पवारांचे थेट शब्दांत भाष्य, म्हणाले...
7
'सुनिताला परवानगी देण्यात यावी...', केजरीवाल यांची न्यायालयाकडे नवी विनंती; अर्ज करत केल्या दोन मागण्या
8
अमेरिकन रॅपर ड्रेक मालामाल! भारत-पाक वर्ल्ड कप सामन्यात सट्टात जिंकले ७ कोटी!!
9
शशांक केतकरच्या तक्रारीनंतर BMC ची तातडीने कारवाई, स्वच्छ केला परिसर; अभिनेता म्हणाला...
10
Human finger in ice cream in Mumbai: ज्या कंपनीच्या आईस्क्रिम कोनमध्ये सापडलं मानवी बोट, ती कंपनी आता म्हणते, "आम्ही तर आता.."
11
Mandira Bedi : "ते माझं घर चालवायला येणार नाहीत, दुःख आहे जे...."; पतीच्या निधनावर पहिल्यांदा बोलली मंदिरा
12
तो लॅपटॉप सोबतच ठेवतो अन् मॅच संपल्यावर ऑफिस काम करतो! सौरभ नेत्रावळकरची कमिटमेंट
13
अयोध्येला जाणाऱ्यांची संख्या घटली, स्पाइसजेटनं विमान सेवा बंद केली!
14
Fact Check: शपथविधी सोहळ्यात गडकरींनी PM मोदींना अभिवादन केले नाही? पाहा, दाव्यामागचे सत्य
15
लय भारी! WhatsApp वर आलं Zoom सारखं फीचर; ३२ लोकांना करता येणार Video कॉल
16
Review: खऱ्या नायकाच्या संघर्षाची 'गोल्ड'न स्टोरी, वाचा कसा आहे कार्तिकचा 'चंदू चॅम्पियन'
17
Fact Check : राष्ट्रगीत सुरू होतं आणि पंतप्रधान मोदी खुर्चीवर बसले?; जाणून घ्या 'सत्य'
18
गुरुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वृद्धी योग; वरदान काळ, तुमची रास कोणती?
19
तो फोन शेवटचा! मुलांना मन लावून अभ्यास करण्याचा सल्ला अन्...; काळजात चर्र करणारी घटना
20
Sushant Singh Death Anniversary : सुशांतच्या बहिणीने शेअर केला थ्रोबॅक व्हिडीओ; म्हणाली - 'हा राजकीय अजेंडा...'

बारावी निकाल: अमरावती विभागात वाशिम जिल्हा अव्वल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 2:09 PM

वाशिम जिल्ह्याचा निकाल ९०.४० टक्के लागला असून, अमरावती विभागात वाशिम जिल्हा पहिल्या स्थानावर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षा निकाल २८ मे रोजी जाहिर झाला असून, वाशिम जिल्ह्याचा निकाल ९१.५५ टक्के  लागला आहे. अमरावती विभागात सलग तिसºया वर्षीही वाशिम जिल्हा प्रथम स्थानावर राहिला आला आहे. जिल्ह्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १७ हजार९६० नियमित विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी १७ हजार ९५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १६ हजार ४३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९१.५५ अशी आहे. उत्तीर्ण १६ हजार ४३५ विद्यार्थ्यांमध्ये ९६१७ मुले व ६८१८ मुली आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची सरासरी टक्केवारी ९०.१८ तर मुलींची सरासरी टक्केवारी ९३.५५ अशी आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी निकालात मुलांपेक्षा जास्त टक्केवारी मिळवित बाजी मारली. जिल्ह्यात सर्वाधिक निकाल वाशिम तालुक्याचा ९३.२७ टक्के लागला आहे. त्याखालोखाल मंगरूळपीर तालुका ९३.१८ टक्के, मानोरा तालुका ९३.१३ टक्के, रिसोड तालुका ९२.९५ टक्के, मालेगाव तालुका ८७.७५ टक्के तर कारंजा तालुक्याचा सर्वात कमी अर्थात ८६.५२ टक्के निकाल लागला आहे. गतवर्षी जिल्ह्यात मंगरूळपीर तालुक्याचा सर्वाधिक निकाल लागला होता. वाशिम तालुक्यात २६८३ मुले व १८३७ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी २४७९ मुले व १७३७ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९२.४० तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४.५६ अशी आहे. मालेगाव तालुक्यात १४३१ मुले व ८५५ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी १२३१ मुले व ७७५ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८६.०२ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९०.६४ अशी आहे. रिसोड तालुक्यात २८२९ मुले व १६०९ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी २६०६ मुले व १५१९ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९२.१२ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४.४१ अशी आहे. कारंजा तालुक्यात १२६२ मुले व ११६४ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी १०४३ मुले व १०५६ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८२.६५ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९०.७२ अशी आहे. मंगरूळपीर तालुक्यात १२१८ मुले व १०११ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी १११९ मुले व ९५८ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९१.८७ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४.७६ अशी आहे. मानोरा तालुक्यात १२४१ मुले व ८१२ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी ११३९ मुले व ७७३ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९१.७८ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५.२० अशी आहे. जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल ९६.३० टक्के, कला शाखेचा ८६.९६ टक्के, वाणिज्य शाखेचा ९६.०६ टक्के तर व्होकेशनल शाखेचा ८३.३२ टक्के निकाल लागला आहे. यावर्षी इयत्ता बारावीच्या पुनर्परिक्षार्थींचा निकाल ४३.३३ टक्के लागला आहे. ९१४ पुनर्परिक्षार्थींनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यामध्ये ७४६ मुले आणि १६८ मुलींचा समावेश आहे. त्यापैकी ९१४ पुनर्परिक्षार्थींनी परीक्षा दिली असून, ३९६ पुनर्परिक्षार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ३२३ मुले आणि ७३ मुलींचा समावेश असून, मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ४३.४० तर मुलींची टक्केवारी ४३.४५ अशी आहे.

टॅग्स :washimवाशिमHSC Exam Resultबारावी निकाल