शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नियमांना नागरिकांकडून बगल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:56 IST

मागील आठवड्यात अचानक कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना नियम घालून दिले आहेत. गतवर्षापासून कोरोना धुमाकूळ घालत आहे. ...

मागील आठवड्यात अचानक कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना नियम घालून दिले आहेत. गतवर्षापासून कोरोना धुमाकूळ घालत आहे. यात अनेकांचे प्राणसुद्धा गेले आहेत. संसर्गजन्य आजार असल्याने सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क लावणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आदी बाबी आवश्यक आहेत. मात्र, तरीसुद्धा अनेकजण हे नियम पाळत नसल्याचे चित्र आहे. मास्क वापरण्यापासूनच्या सूचना नागरिकांना द्याव्या लागत आहेत. जिल्ह्यात २३ फेब्रुवारीपर्यंत ६०३ ॲक्टिव्ह रुग्ण होते. तर दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. मात्र, अनेकजण नियम पाळत नसल्याने प्रशासनाला पुन्हा संचारबंदी लागू करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे गर्दी टाळून मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टन्सिंग ठेवावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.