शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
2
भाजपचे उमदेवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
3
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
4
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
5
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
6
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
7
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
8
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
9
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
10
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
11
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
12
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
13
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
14
फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर
15
"मी पंकज कपूर यांचा मुलगा आहे, पण इंडस्ट्रीत एकटा लढलो", शाहिद कपूर स्पष्टच बोलला
16
हर्षित राणाला गौतम गंभीर इतक्या वेळा संधी का देतो? व्हायरल VIDEO मध्ये सापडलं उत्तर
17
सोन्यापेक्षा चांदीची किंमत दुप्पट! चांदीने दिला ८५% रिटर्न, लवकरच २ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार करणार?
18
केंद्राचा मोठा निर्णय; पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलले, ‘सेवा तीर्थ’ नावाने ओळखले जाणार
19
कमाल झाली! चाहता मैदानात घुसला; सामना थांबला आणि हार्दिक पांड्यानं हसत सेल्फीसाठी दिली पोझ
20
स्कूटी घेऊन जाताना कोसळला, २७ वर्षीय विनीतचा हार्ट अटॅकने मृत्यू; धडकी भरवणारा Video
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या वातावरणाचा फटका : वाशिम जिल्ह्यात तूर पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:53 IST

वाशिम - वातावरणातील बदल आणि काही भागात दाट धुके पडत असल्याने तूर पिकावर आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगाला वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी कृषी विभागाने पाहणी व उपाययोजनांबाबत मार्गदर्शन मोहिम हाती घेतली.

ठळक मुद्देकृषी विभागाने आरंभली पाहणी मोहितजमिनीतील बुरशीमुळे रोगाचा प्रादुर्भाव : शास्त्रज्ञांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - वातावरणातील बदल आणि काही भागात दाट धुके पडत असल्याने तूर पिकावर आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगाला वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी कृषी विभागाने पाहणी व उपाययोजनांबाबत मार्गदर्शन मोहिम हाती घेतली. हवामानाचा परिणाम, दाट धुके व जमिनीतील बुरशीमुळे या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचा दावा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वाशिम कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. भारत गिते यांनी केला.यावर्षी सुरूवातीपासूनच शेतकºयांना नानाविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. कपाशीवरील बोंडअळींच्या आक्रमणाने अगोदरच गारद झालेला शेतकरी आता तूर पिकावरील मूर रोगाने पुरता कोलमडून जात आहे. यावर्षी खरिप हंगामात वाशिम जिल्ह्यात एकूण चार लाख नऊ हजार ६३ हेक्टरपैकी पावणे चार लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यापैकी ७० हजार हेक्टरच्या आसपास तूरीची लागवड होती. आतापर्यंत बºयापैकी असलेल्या तूरीला शेवटच्या टप्प्यात वातावरणातील बदलाचा विपरित परिणाम जाणवत आहे. हवामानाचा परिणाम, दाट धुके व जमिनीतील बुरशीमुळे तूरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषी विभागाने केलेल्या पाहणीतून समोर आले. वाशिम तालुक्यातील तांदळी शेवई परिसर, मालेगाव तालुक्यातील मुंगळा, खेर्डी, रेगाव, कळंबेश्वर, पांगरी बु., मंगरूळपीर तालुक्यात हिसई, रहित, पार्डीताड, रिसोड तालुक्यात पळसखेडा, वाकद, व्याड आदी परिसरातील तूरीवर मर रोगाचा अधिक प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते. दरम्यान, कृषी विभागाने केलेल्या पाहणीतही मर रोगाचे प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकºयांनी कोणत्या उपाययोजना कराव्या, यासंदर्भात कृषी विभागाने मार्गदर्शन मोहिम हाती घेतली. शेतकºयांनी घाबरून न जाता कृषी विभागाच्या सल्ल्याने मर रोगावर नियंत्रण मिळवावे, काही अडचण, शंका असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, वाशिम कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. भारत गिते, करडा येथील कृषि विज्ञान केंद्राचे विषय तज्ज्ञ तुषार देशमुख यांनी केले. 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती