शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

बदलत्या वातावरणाचा फटका : वाशिम जिल्ह्यात तूर पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:53 IST

वाशिम - वातावरणातील बदल आणि काही भागात दाट धुके पडत असल्याने तूर पिकावर आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगाला वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी कृषी विभागाने पाहणी व उपाययोजनांबाबत मार्गदर्शन मोहिम हाती घेतली.

ठळक मुद्देकृषी विभागाने आरंभली पाहणी मोहितजमिनीतील बुरशीमुळे रोगाचा प्रादुर्भाव : शास्त्रज्ञांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - वातावरणातील बदल आणि काही भागात दाट धुके पडत असल्याने तूर पिकावर आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगाला वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी कृषी विभागाने पाहणी व उपाययोजनांबाबत मार्गदर्शन मोहिम हाती घेतली. हवामानाचा परिणाम, दाट धुके व जमिनीतील बुरशीमुळे या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचा दावा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वाशिम कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. भारत गिते यांनी केला.यावर्षी सुरूवातीपासूनच शेतकºयांना नानाविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. कपाशीवरील बोंडअळींच्या आक्रमणाने अगोदरच गारद झालेला शेतकरी आता तूर पिकावरील मूर रोगाने पुरता कोलमडून जात आहे. यावर्षी खरिप हंगामात वाशिम जिल्ह्यात एकूण चार लाख नऊ हजार ६३ हेक्टरपैकी पावणे चार लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यापैकी ७० हजार हेक्टरच्या आसपास तूरीची लागवड होती. आतापर्यंत बºयापैकी असलेल्या तूरीला शेवटच्या टप्प्यात वातावरणातील बदलाचा विपरित परिणाम जाणवत आहे. हवामानाचा परिणाम, दाट धुके व जमिनीतील बुरशीमुळे तूरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषी विभागाने केलेल्या पाहणीतून समोर आले. वाशिम तालुक्यातील तांदळी शेवई परिसर, मालेगाव तालुक्यातील मुंगळा, खेर्डी, रेगाव, कळंबेश्वर, पांगरी बु., मंगरूळपीर तालुक्यात हिसई, रहित, पार्डीताड, रिसोड तालुक्यात पळसखेडा, वाकद, व्याड आदी परिसरातील तूरीवर मर रोगाचा अधिक प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते. दरम्यान, कृषी विभागाने केलेल्या पाहणीतही मर रोगाचे प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकºयांनी कोणत्या उपाययोजना कराव्या, यासंदर्भात कृषी विभागाने मार्गदर्शन मोहिम हाती घेतली. शेतकºयांनी घाबरून न जाता कृषी विभागाच्या सल्ल्याने मर रोगावर नियंत्रण मिळवावे, काही अडचण, शंका असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, वाशिम कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. भारत गिते, करडा येथील कृषि विज्ञान केंद्राचे विषय तज्ज्ञ तुषार देशमुख यांनी केले. 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती