शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

सेंट्रल बँकेने १०० हून अधिक शेतकऱ्यांना ठेवले कर्जमाफीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 16:16 IST

शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थींची माहिती दडविली

ठळक मुद्देअनसिंगच्या सेंट्रल बँकेचा प्रतापशेतकºयांनी  केलेल्या चौकशीत हा प्रकार समोर आला आहे. शेतकºयाना दोन वर्षाच्या व्याजाचा भुर्दंड बसणार आहे.

लोकमत न्युज नेटवर्कअनसिंग :  आघाडी सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत १०० पेक्षा अधिक शेतकºयांच्या कर्जमाफीची माहिती दडविल्याचा प्रकार सेंट्रल बँक  आॅफ इंडियाच्या अनसिंग येथील शाखेने केल्याचे उघडकीस आले आहे. महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र शेतकºयांच्या यादीत नाव न दिसल्याने शेतकºयांनी  केलेल्या चौकशीत हा प्रकार समोर आला आहे.  सेंट्रल बँके च्या अनसिंग येथील शाखेतून अनसिंग, पिंपळगाव, सोंडा, सापळी, उमरा कापसे, उमरा शमशोद्दीन, पार्डीआसरा व इतर गावातील शेकडो शेतकºयांनी हंगाम २०१५-१६ व त्यापूर्वी पिक कर्ज घेतले होते. या कर्जदार शेतकºयांनी नापिकीमुळे बँकेच्या पीक कर्जाचा भरणा केला नव्हता. दरम्यान, राज्यातील तत्कालीन आघाडी सरकारने २०१५ -१६ पूर्वी थकीत कर्जदार असलेल्या शेतकºयांना छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली; परंतु अनसिंग येथील सेंट्रल बँकेच्या अनसिंग येथील तत्कालीन व विद्यमान शाखा व्यवस्थापक  व बँकेतील कर्मचाºयांनी या योजनेतंर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या १०० पेक्षा जास्त शेतकºयांना या बाबत कोणतीच माहिती दिली नाही. आता राज्यातील विद्यमान महाविकास आघाडीच्या सरकारने १ एप्रिल २०१५ ते ३० सप्टेंबर २०२० पर्यंत दोन लाख रुपये पर्यंतचे थकित कृषीकर्ज असलेल्या शेतकºयांसाठी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अमलात आणली. या योजनेच्या यादीत काही शेतकºयांना आपले नाव दिसले नाही. त्यावेळी अनसिंग येथील रहिवासी महिला शेतकरी सारिका विजय गट्टाणी यांनी चौकशी केली. तेव्हा तुमचे नाव छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत असल्यांचे सांगत आता तुम्ही थकीत व्याजाची रक्कम भरण्याचा असा सल्ला शाखा व्यवस्थापकांनी दिला. त्यावरून शेतकºयांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला.   दोन वर्षांच्या व्याजाचा नाहक भुर्दंडअनसिंग येथील सारिका गट्टाणी यांच्यासह सापळी येथील तात्याराव रायाजी ढगे, भगवान तात्याराव ढगे व इतर  शेतकºयांनाही सेंट्रल बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी थकित व्याजाची रक्कम भरण्याचा सल्ला दिला आहे. या प्रकारामुळे अनसिंग व परिसरातील १०० पेक्षा जास्त शेतकºयाना दोन वर्षाच्या व्याजाचा भुर्दंड बसणार आहे. तसेच हे सर्व शेतकरी आधीची कर्जमाफी होऊनही हंगाम २०१८-१९ व २०१९-२० मध्ये नवीन पिक कर्जापासून वंचित राहिलेत.  

 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र असलेल्या सर्वच शेतकºयांना त्याची माहिती आणि लाभही देण्यात आला आहे. शासन निर्णयानुसारच कर्जमाफीची यादी जाहीर झाली होती. काही शेतकºयांचा याबाबत गैरसमज झाला आहे. ते शेतकरी सध्याच्या कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरतात. त्यांना त्याची माहिती देण्यात आली आहे. -गणेश जाधव, शाखा व्यवस्थापक, सेंट्रल बँक, अनसिंग

मी २०१५-१६ मध्ये १ लाख रुपये कर्ज घेतले होते. त्यानंतर २९ नोव्हेंबर २०१७ रोजी तत्कालीन शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत १ लाख ५ हजार ५७० रुपये कर्जमाफी झाली होती. त्याबाबतचा एसएमएसही आला होता. त्यावेळी २ हजार ९१२ रुपये व्याजाची रक्कम भरावी लागणार होती. त्यामुळे मी वारंवार सेंट्रल बँकेच्या शाखेशी संपर्कही केला; परंतु तुम्हाला कर्जमाफी मिळाली नसल्याचे शाखाधिकाºयांनी सांगितले होते. -नंदकिशोर नारायण कापसे,शेतकरी, उमरा कापसे

टॅग्स :washimवाशिमbankबँकFarmerशेतकरी