शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

सेंट्रल बँकेने १०० हून अधिक शेतकऱ्यांना ठेवले कर्जमाफीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 16:16 IST

शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थींची माहिती दडविली

ठळक मुद्देअनसिंगच्या सेंट्रल बँकेचा प्रतापशेतकºयांनी  केलेल्या चौकशीत हा प्रकार समोर आला आहे. शेतकºयाना दोन वर्षाच्या व्याजाचा भुर्दंड बसणार आहे.

लोकमत न्युज नेटवर्कअनसिंग :  आघाडी सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत १०० पेक्षा अधिक शेतकºयांच्या कर्जमाफीची माहिती दडविल्याचा प्रकार सेंट्रल बँक  आॅफ इंडियाच्या अनसिंग येथील शाखेने केल्याचे उघडकीस आले आहे. महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र शेतकºयांच्या यादीत नाव न दिसल्याने शेतकºयांनी  केलेल्या चौकशीत हा प्रकार समोर आला आहे.  सेंट्रल बँके च्या अनसिंग येथील शाखेतून अनसिंग, पिंपळगाव, सोंडा, सापळी, उमरा कापसे, उमरा शमशोद्दीन, पार्डीआसरा व इतर गावातील शेकडो शेतकºयांनी हंगाम २०१५-१६ व त्यापूर्वी पिक कर्ज घेतले होते. या कर्जदार शेतकºयांनी नापिकीमुळे बँकेच्या पीक कर्जाचा भरणा केला नव्हता. दरम्यान, राज्यातील तत्कालीन आघाडी सरकारने २०१५ -१६ पूर्वी थकीत कर्जदार असलेल्या शेतकºयांना छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली; परंतु अनसिंग येथील सेंट्रल बँकेच्या अनसिंग येथील तत्कालीन व विद्यमान शाखा व्यवस्थापक  व बँकेतील कर्मचाºयांनी या योजनेतंर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या १०० पेक्षा जास्त शेतकºयांना या बाबत कोणतीच माहिती दिली नाही. आता राज्यातील विद्यमान महाविकास आघाडीच्या सरकारने १ एप्रिल २०१५ ते ३० सप्टेंबर २०२० पर्यंत दोन लाख रुपये पर्यंतचे थकित कृषीकर्ज असलेल्या शेतकºयांसाठी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अमलात आणली. या योजनेच्या यादीत काही शेतकºयांना आपले नाव दिसले नाही. त्यावेळी अनसिंग येथील रहिवासी महिला शेतकरी सारिका विजय गट्टाणी यांनी चौकशी केली. तेव्हा तुमचे नाव छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत असल्यांचे सांगत आता तुम्ही थकीत व्याजाची रक्कम भरण्याचा असा सल्ला शाखा व्यवस्थापकांनी दिला. त्यावरून शेतकºयांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला.   दोन वर्षांच्या व्याजाचा नाहक भुर्दंडअनसिंग येथील सारिका गट्टाणी यांच्यासह सापळी येथील तात्याराव रायाजी ढगे, भगवान तात्याराव ढगे व इतर  शेतकºयांनाही सेंट्रल बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी थकित व्याजाची रक्कम भरण्याचा सल्ला दिला आहे. या प्रकारामुळे अनसिंग व परिसरातील १०० पेक्षा जास्त शेतकºयाना दोन वर्षाच्या व्याजाचा भुर्दंड बसणार आहे. तसेच हे सर्व शेतकरी आधीची कर्जमाफी होऊनही हंगाम २०१८-१९ व २०१९-२० मध्ये नवीन पिक कर्जापासून वंचित राहिलेत.  

 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र असलेल्या सर्वच शेतकºयांना त्याची माहिती आणि लाभही देण्यात आला आहे. शासन निर्णयानुसारच कर्जमाफीची यादी जाहीर झाली होती. काही शेतकºयांचा याबाबत गैरसमज झाला आहे. ते शेतकरी सध्याच्या कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरतात. त्यांना त्याची माहिती देण्यात आली आहे. -गणेश जाधव, शाखा व्यवस्थापक, सेंट्रल बँक, अनसिंग

मी २०१५-१६ मध्ये १ लाख रुपये कर्ज घेतले होते. त्यानंतर २९ नोव्हेंबर २०१७ रोजी तत्कालीन शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत १ लाख ५ हजार ५७० रुपये कर्जमाफी झाली होती. त्याबाबतचा एसएमएसही आला होता. त्यावेळी २ हजार ९१२ रुपये व्याजाची रक्कम भरावी लागणार होती. त्यामुळे मी वारंवार सेंट्रल बँकेच्या शाखेशी संपर्कही केला; परंतु तुम्हाला कर्जमाफी मिळाली नसल्याचे शाखाधिकाºयांनी सांगितले होते. -नंदकिशोर नारायण कापसे,शेतकरी, उमरा कापसे

टॅग्स :washimवाशिमbankबँकFarmerशेतकरी