शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

वाशिम जिल्ह्यातील पुलांची अवस्था वाईट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 1:51 PM

वाशिम: जिल्ह्यात विविध राज्यमार्ग, जिल्हा मार्गासह इतर महत्त्वाच्या मार्गावरील काही पुलांची अवस्था वाईट झाली आहे.

ठळक मुद्दे अनेक पुलांची उंची वाढविण्याची गरज 

वाशिम: जिल्ह्यात विविध राज्यमार्ग, जिल्हा मार्गासह इतर महत्त्वाच्या मार्गावरील काही पुलांची अवस्था वाईट झाली आहे. कठडे ढासळण्याच्या प्रकारासह पुलांच्या गाळ्यातील भिंतीही जीर्ण होत असताना या पुलांची किमान किरकोळ दुरुस्ती करण्यासह काही पुलांची उंची वाढविणे आवश्यक असताना त्याची दखल घेण्यात येत असल्याचे दिसत नाही.

जिल्ह्यातील राज्य मार्ग, जिल्हा मार्ग आणि इतर महत्त्वाच्या मार्गावर मिळून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्त्यारित येणाºया पुलांची संख्या २१५ आहे. यातील निम्म्याहून अधिक पुलांची उभारणी किमान २५ वर्षांपूर्वी झाली आहे. भुगोलीय परिवर्तन आणि नदी, नाले खचल्याने अरूंद झाले असताना पाण्याच्या प्रवाहामुळे पुलांची अवस्थाही वाईट झाली आहे. अनेक ठिकाणी, तर नाल्याच्या उंचीपेक्षा पूल खोलगट भागात असल्याचेही पाहायला मिळत आहे. पावसाच्या दिवसांत अशा पुलांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. परिणामी वाहतुकीचा खोळंबा होतो, तसेच अचानक वाढणाºया पुराच्या लोंढ्यामुळे अपघाताचीही भिती असते. या पृष्ठभूमीवर पुलांची दुरुस्ती करून उंची वाढविण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने फेब्रुवारी २०१७ मध्ये जिल्ह्यातील पुलांचे निरीक्षण केले; परंतु त्यांच्या अहवालानुसार ५ पुलांची किरकोळ दुरुस्ती, तर केवळ एका पुलाची विशेष दुरुस्ती करणे आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा अहवाल तांत्रिकदृष्ट्या योग्य असला तरी अनेक पुलांवर वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागतो. पुलांची अवस्था वाईट झाली असताना रुंदीही कमी असल्याने या पुलांची दुरुस्ती करणे आवश्यक असून, संभाव्य अपघाताची शक्यता लक्षात घेता. बांधकाम विभागाने या संदर्भात वरिष्ठस्तरावर निरीक्षण अवाहल पाठवून पुलांची दुरुस्ती करण्याची गरज आहे. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग