शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
6
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
7
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
8
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
9
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
10
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
11
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
12
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
13
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
14
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
15
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
16
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
17
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
20
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘एटीएम’सह बँकांमध्ये ‘कॅश’चा तुटवडा!

By admin | Updated: April 13, 2017 02:12 IST

दैनंदिन व्यवहारांवर परिणाम : सर्वच बँकांचे ‘आॅल टाइम मनी’ धोरण ठरतेय कुचकामी

वाशिम : जिल्ह्यातील सर्वच ठिकाणचे एटीएम रिकामे झाले असून, बँकांमध्येही ‘कॅश’चा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे रोखीने चालणाऱ्या दैनंदिन व्यवहारांवर विपरित परिणाम होत असून, या समस्येपुढे बँक प्रशासनही हतबल झाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी चलनातून ५०० आणि हजारच्या नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे पुढचे तब्बल अडीच ते तीन महिने बाजारपेठेतील सर्व व्यवहार विस्कळित झाले होते. बँकांमध्ये ठराविक रकमांचाच ‘विड्रॉल’ मिळत होता. तसेच एटीएममध्येही कॅश मिळणे दुरापास्त झाले होते. ही परिस्थिती नियंत्रणात येत असतानाच पुन्हा एकवेळ चलन तुटवड्याचा प्रश्न गंभीर झाला असून, नागरिक त्रस्त झाले आहेत.नोटाबंदीमुळे जेवढी कॅश बँकांमध्ये भरल्या गेली, तेवढ्या कॅशच्या बदल्यात ‘आरबीआय’ने नव्याने २ हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा बँकांना उपलब्ध करून दिल्या; मात्र त्यापैकी बहुतांश ‘कॅश’ पुन्हा चुकीच्या पद्धतीने चलनातून गायब झाल्यानेच हा प्रश्न उद्भवल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, आरबीआयकडून सद्य:स्थितीत सर्वच बँकांना व्यवहारासाठी पुरेसा पैसा मिळेनासा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश सर्वच बँकांच्या एटीएममध्ये ठणठणाट आहे. जिल्ह्यात वाशिम, मंगरूळपीर, कारंजा आणि रिसोड येथे ‘करन्सी चेस्ट’ची सुविधा असून, स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, बँक आॅफ इंडियासह इतर बँकांचे ६२ एटीएम आहेत; परंतु पुरेशी रक्कम नसल्यामुळे बहुतांश एटीएम बंद राहत आहेत. त्यामुळे नागरिकांना आपल्या बँकेच्या खात्यातून पैसेच विड्रॉल करता येऊ नये, याची खबरदारी घेतल्या गेल्याचे चित्र जिल्हाभरात दिसून येत आहे. तथापि, दैनंदिन व्यवहारांकरिता सर्वच एटीएमसह बँकेतून कॅश मिळणे दुरापास्त झाल्यामुळे जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर, कारंजा, रिसोड, मालेगाव तथा मानोरा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले असून उद्भवलेला प्रश्न तत्काळ निकाली निघावा, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. शिरपूर येथील बँक आॅफ महाराष्ट्रचे ‘एटीएम’ नोटाबंदीनंतर पाच महिन्यांपासून बंदच!जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथे बँक आॅफ महाराष्ट्रचे ‘एटीएम’ असून ८ नोव्हेंबरला झालेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर ते आजतागायत बंदच आहे. याशिवाय जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एटीएममध्येही नियमित कॅश राहत नाही. यामुळे शिरपूरसह नजिकच्या गावांमधील सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना तालुकास्थळी अर्थात मालेगावला यावे लागत आहे; मात्र मालेगावमधील एटीएमही गेल्या अनेक दिवसांपासून बंदच राहत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे नागरिकांनी त्यांच्याकडे असलेल्या ५०० व हजारच्या नोटा बँकेत जमा केल्या, तेवढ्या नोटांची ‘आरबीआय’ने छपाई करून बँकांना वितरित केल्या; मात्र विड्रॉलच्या तुलनेत बँकांमध्ये डिपॉझिटचे प्रमाण अगदीच कमी असल्यामुळे चलन तुटवड्याचा प्रश्न पुन्हा एकवेळ निर्माण झाला आहे. सोबतच एटीएमही बंद राहत आहेत. उद्भवलेली समस्या दूर करण्यासाठी नागरिकांनी पैसा चलनात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. - व्ही.एच.नगराळे, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बँक