शहरं
Join us  
Trending Stories
1
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
2
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
3
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
4
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
5
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
6
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
7
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
8
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
9
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
10
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
11
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
12
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
13
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
14
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
15
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
16
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
18
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
19
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
20
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा

कीटकनाशकांच्या विक्रीवर कृषी विभागाचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 1:57 PM

कृषी सेवा केंद्रात विकल्या जाणाऱ्या  कीटकनाशकांची तपासणी करण्याबरोबरच फवारणी यंत्रांचीही गुण नियंत्रण पथकांमार्फत तपासणी केली जात आहे.

ठळक मुद्दे गतवर्षी कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन २०० हून अधिक शेतकºयांचा बळी गेला. गतवर्षीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ न निष्पाप बळी जाऊ नयेत म्हणून कृषी विभाग सजग झाला आहे.

वाशिम: गतवर्षी अमरावती विभागात कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विषबाधा झाल्याने शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. नियमबाह्य अणि बोगस कीटकनाशकाच्या वापरामुळे हा प्रकार घडला. यंदा हा प्रकार होऊ नये म्हणून कृषी विभाग कमालीची दक्षता बाळगून आहे. यासाठी कृषी सेवा केंद्रात विकल्या जाणाऱ्या  कीटकनाशकांची तपासणी करण्याबरोबरच फवारणी यंत्रांचीही गुण नियंत्रण पथकांमार्फत तपासणी केली जात आहे.अमरावती विभागात गतवर्षी कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन २०० हून अधिक शेतकºयांचा बळी गेला. प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यात याचे सर्वाधिक प्रमाण होते. या प्रकाराची दखल राज्य शासनाने घेऊन कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले होते. या घटनांनंतर काही कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द करण्यासह काहींवर कायदेशीर कारवाईसुद्धा झाली होती. आता यंदाच्या खरीप हंगामातील पेरणी ७० टक्क्यांहून अधिक आटोपली असून, सुरुवातीच्या पेरणीची पिके चांगली तरारली आहेत. या पिकांवर कुठेकुठे अळ्या, किडींचा प्रादुर्भाव होत असताना शेतकऱ्यांनी फवारणीची लगबग सुरू केली आहे. अशात गतवर्षीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ न निष्पाप बळी जाऊ नयेत म्हणून कृषी विभाग सजग झाला आहे. कृषी सेवा केंद्र प्रमाणित औषधांचीच विक्री करीत आहेत की बनावट आणि जहाल कीटकनाशके विकून शेतकऱ्यांचा जीव धोक्यात घालत आहेत, याची पडताळणी करण्यासाठी कृषी विभागाकडून कृषी सेवा केंद्रांची पाहणी करण्यात येत आहे. या दरम्यान, परवाना नसलेल्या काही कीटनाशकांच्या विक्रीवर कृषी विभागाने बंदीही घातली आहे.शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, जहाल कीटकनाशकांच्या विक्रीतून शेतकºयांचा जीव धोक्यात येऊ नये, याची दक्षता कृषी विभाग बाळगत असून, यासाठीच कृषी सेवा केंद्रांवरील कीटकनाशकांची गुण नियंत्रण पथकांमार्फत तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीत परवाना नसलेल्या किंवा जहाल कीटकनाशकांची विक्री करण्यात येत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाईसुद्धा करण्यात येत आहे.-दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम.

 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती